Maharashtra Rain News : हिंगोली शहर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हाहाकार उडवला आहे. पुराच्या पाण्यात अनेक वाहनं बुडाली आहेत आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. बांगर नगरसह अनेक भागांना पुराच्या पाण्यानं वेढा दिल्यामुळे शेकडो लोक अडकले आहेत.
ADVERTISEMENT
हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. हिंगोलीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे, ज्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित स्थळी थांबावे. प्रशासनाने आपत्ती निवारण कार्यासाठी रेस्क्यू टीम तैनात केली आहे व नागरिकांना मदत केली जात आहे.
ADVERTISEMENT
