काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? का उपस्थित होतोय हा प्रश्न?

मुंबई तक

रशिद किडवई काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न देशाला सध्या पडला आहे. कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला उभारी देण्याचं काम हे दोन चेहरे करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. अशातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसच्या राजकारणात भूकंप झाल्याचं पाहण्यास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रशिद किडवई

काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न देशाला सध्या पडला आहे. कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवाणी या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला उभारी देण्याचं काम हे दोन चेहरे करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. अशातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसच्या राजकारणात भूकंप झाल्याचं पाहण्यास मिळालं एवढंच नाही तर अमरिंदर सिंग हे भाजपच्या वाटेवर आहेत अशीही चर्चा आहे.

गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि JNU चा माजी विद्यार्थी कन्हैय्या कुमार या दोघांना काँग्रेसमध्ये घेण्यास काही जुन्या जाणत्यांनी विरोध दर्शवला होता. हे दोघेही काँग्रेसच्या विचारधारेच्या जवळचे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी, नेत्यांनी अनेकदा काँग्रेसचं सहकार्य केलं आहे. सीपीआयने इंदिरा गांधी यांना मदत केली होती. त्यानंतर 1991-92 च्या वेळी पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते त्यांच्याही संकटात डावे धावून गेले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp