Groundwater: देशातील 80 टक्के लोक पित आहेत विषारी पाणी; सरकारची संसदेत धक्कदायक माहिती
देशातील पाण्याचा दर्जा खालावत असल्याचे सरकारने संसदेत मान्य केले आहे. राज्यसभेत केंद्र सरकारने दिलेली आकडेवारी धक्कादायकच तर आहेच, पण भीतीदायक देखील आहे. या आकडेवारीनुसार आपण आजवर जे पाणी पीत आलो ते ‘विषारी’ आहे. देशातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये भूजलामध्ये विषारी धातूंचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. Ground Water बाबत देशातील आकडेवारी काय सांगते? – 25 […]
ADVERTISEMENT

देशातील पाण्याचा दर्जा खालावत असल्याचे सरकारने संसदेत मान्य केले आहे. राज्यसभेत केंद्र सरकारने दिलेली आकडेवारी धक्कादायकच तर आहेच, पण भीतीदायक देखील आहे. या आकडेवारीनुसार आपण आजवर जे पाणी पीत आलो ते ‘विषारी’ आहे. देशातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांमध्ये भूजलामध्ये विषारी धातूंचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.
Ground Water बाबत देशातील आकडेवारी काय सांगते?
– 25 राज्यांतील 209 जिल्ह्यांतील काही भागात भूजलात आर्सेनिकचे प्रमाण 0.01 मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.
– 29 राज्यांतील 491 जिल्ह्यांतील काही भागात भूजलात लोहाचे (Iron) प्रमाण 1 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.
– 11 राज्यांतील 29 जिल्ह्यांतील काही भागात भूजलात कॅडमियमचे प्रमाण 0.003 मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.