भाजपसोबत राहावं म्हणून ‘या’ आमदाराला रश्मी शुक्लांनी धमकावलेलं, आव्हाडांचा खळबळजनक आरोप

मुंबई तक

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आता पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता अशा आरोप केला आहे की, ‘अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपसोबत राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावर दबाव आणला होता.’ आव्हाडांच्या या आरोपामुळे आता नवं राजकारण सुरु […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आता पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता अशा आरोप केला आहे की, ‘अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपसोबत राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावर दबाव आणला होता.’ आव्हाडांच्या या आरोपामुळे आता नवं राजकारण सुरु झालं आहे.

‘शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत.’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. आव्हाडांनी केलेला हा आरोप अत्यंत गंभीर असून आता याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Phone Tapping अत्यंत गंभीर, रश्मी शुक्लांनी केली महाराष्ट्राची बदनामी-जितेंद्र आव्हाड

पाहा राजेंद्र पाटील-यड्रावकर नेमके आहेत तरी कोण

हे वाचलं का?