Mumbai Tak /बातम्या / अमरावती हिंसाचारामागे भाजपचा हात होता? काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?
बातम्या

अमरावती हिंसाचारामागे भाजपचा हात होता? काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावती, मालेगाव, नांदेड या ठिकाणी त्रिपुरा मध्ये घडलेल्या कथित घटनेचे पडसाद उमटले. या सगळ्या घटना आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राचं गृह खातं हे सातत्याने चर्चेत आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप, त्यामुळे त्यांना सोडावं लागलेलं गृहमंत्रीपद त्यानंतर दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होणं या सगळ्या घडामोडी गेल्या वर्षभरात घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता दोन वर्षे पूर्ण होतील. त्याच निमित्ताने इंडिया टुडेचे सीनियर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला.

काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

महाराष्ट्रात दंगेसदृश परिस्थिती आहे की? परिस्थिती नियंत्रणात आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘अमरावती, नांदेड आणि इतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या ज्या घटना घडल्या त्या ठिकाणी आता परिस्थिती आटोक्यात आहे. शांतता प्रस्थापित झालेली आहे. आता प्रश्न राहतो तो की अशा घटना का घडल्या. त्यामध्ये तपास सुरू आहे पण एक घटना बांगलादेशात घडली, त्याची प्रतिक्रिया त्रिपुरात उमटली. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी काही संघटना 12 नोव्हेंबरला गेल्या होत्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून भाजपतर्फे बंद पुकारला गेला होता.’

भाजपने बंद पुकारल्यानंतर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसाचाराचा प्रकार घडल्याचं राज्याने पाहिलं. मला वाटतं आपण या राज्याचे नागरिक आहोत.तिथे राजकारण आपल्या ठिकाणी पण संयम ठेवलं पाहिजे. राज्य कोरोनाच्या संकटातून आताशा बाहेर पडतं आहे. पोलीस दलावर किती ताण होता हे आपल्याला माहित आहेच. अशा वेळी अशी परिस्थिती निर्माण होणं योग्य नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे अधिक भाष्य करता येणार नाही पण ही परिस्थिती दुर्दैवी आहे असं मत दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत व्यक्त केली आहे.

अमरावती हिंसाचार प्रकरण : भाजपा नेते प्रवीण पोटेंसह दहा जण शरण; पोलिसांनी केली अटक

अमरावतीतल्या हिंसाचारावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. कारण भाजपने या प्रकरणी काँग्रेसवर आरोप केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकऱणी भाजपवर आरोप केला होता. याबाबतही दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

भाजपचं म्हणणं आहे की तुम्ही राजकारण करता आहात. मात्र त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले भाजपने असं समजण्याचं काहीही कारण नाही. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा हा निर्णय आहे. आम्ही आकसातून ही कारवाई केलेली नाही. तपासात जी नावं पुढे येतील त्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × one =

PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री…