राजीव गांधींच्या हत्येत काय होती पेरारिवलनची भूमिका?, आधी फाशी मग जन्मठेप आणि आता सुटका!

मुंबई तक

चेन्नई: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी (Rajeev Gandhi Murder) जन्मठेपेची (life sentence) शिक्षा भोगत असलेल्या एजी पेरारिवलनची (AG Perarivalan) सुटका करण्याचे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अखेर दिले आहेत. राजीव गांधी यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात पेरारिवलनसह 7 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर टाडा न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलनला फाशीची शिक्षा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

चेन्नई: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी (Rajeev Gandhi Murder) जन्मठेपेची (life sentence) शिक्षा भोगत असलेल्या एजी पेरारिवलनची (AG Perarivalan) सुटका करण्याचे आदेश देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अखेर दिले आहेत.

राजीव गांधी यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात पेरारिवलनसह 7 जणांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर टाडा न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलनला फाशीची शिक्षा सुनावली होती. या भीषण हत्याकांडाच्या कटात एजी पेरारिवलन याची महत्त्वाची भूमिका होती.

कोण आहे एजी पेरारिवलन?

एजी पेरारिवलन हा तामिळनाडूतील जोलारपेट शहरातील रहिवासी आहेत. त्याला 11 जून 1991 रोजी राजीव गांधी हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. जेव्हा त्याला पकडण्यात आल तेव्हा त्याचं वय फक्त 19 वर्ष होतं. त्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला होता. पुढील शिक्षणासाठी तो चेन्नईला आला. त्याचवेळी राजीव गांधी हत्येत सामील असलेल्या लोकांमध्ये त्यांचे नाव पुढे आले आणि त्याला अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp