Ind vs Aus 2nd ODI: आजच्या भारत-ऑस्ट्रेलिया मॅचवर मोठं सकंट, जाणून घ्या ताजे अपडेट्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ind vs Aus Live Match: भारत (India) वि. ऑस्ट्रेलिया (Australia)यांच्यात आज (19 मार्च) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे दुसरा वननडे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता. आता हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना खेळवला जाईल. (clouds of crisis on india australia second odi know the latest weather update of visakhapatnam)

विशाखापट्टणम दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान चाहते विशाखापट्टणममधील हवामानावरही लक्ष ठेवून आहेत. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. सामना सुरू असताना चांगला सूर्यप्रकाश असेल पण त्यात बदलही होऊ शकतो. सायंकाळी 3 ते 5 दरम्यान पावसाची सध्या शक्यता वर्तवली जात आहे. सामन्यादरम्यान आर्द्रता 81 टक्के आणि दवबिंदू (Dew Point) 21 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.

Accuweather नुसार हवेची गुणवत्ता चांगली असेल. एकूणच, सामन्यादरम्यान 76 टक्के ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्येही आज सकाळी जोरदार पाऊस झाला. पण या क्षणाचे ताजे अपडेट म्हणजे पाऊस तूर्तास तरी थांबला आहे आणि आकाशही निरभ्र झाले आहे. खेळ वेळेवर सुरू होईल अशी आशा आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ind Vs Aus, 2nd ODi: रोहित शर्मा संघात परतल्यास ‘या’ खेळाडूला जावं लागणार बाहेर

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर असतील. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात सामील झाल्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणे निश्चितच आहे. रोहित पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली. रोहित प्लेइंग-11 मध्ये इशान किशन किंवा सूर्यकुमार यादवची जागा घेऊ शकतो.

ADVERTISEMENT

वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा नसणार कर्णधार; सुनील गावस्करांचं मोठं विधान

ADVERTISEMENT

विशाखापट्टणममधील हवामानाचा अंदाज

कमाल तापमान: 26°C

किमान तापमान: 23 अंश सेल्सिअस

पावसाची शक्यता: 80%

ढगाळ वातावरण: 76%

वाऱ्याचा वेग: 32 किमी/प्रतितास

रोहित शर्मा पहिल्या वनडे सामन्यात न खेळल्याने कोण झालं नाराज?

रोहित शर्मा पहिल्या सामन्यात न खेळल्याने माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर नाराज झाला आहे. रोहित आता विश्वचषकापर्यंत सर्व एकदिवसीय सामने खेळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. आगरकर म्हणाला की, ‘पहिल्या वनडेत भारताला कर्णधार रोहितची गरज भासली होती. ‘आशा आहे की तो आतापासून प्रत्येक वनडेत खेळेल. वैयक्तिक कारणांमुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही. तुमच्याकडे प्लॅन बनविण्यासाठी आता अनेक वनडे सामने नाहीत. त्यामुळे त्याने कोणताही सामना गमावू नये अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत त्याच्या फलंदाजीचा प्रश्न आहे, मला वाटत नाही की यात काही अडचण आहे.’ असं आगरकर यावेळी म्हणाला.

KL Rahulला उपकर्णधारपदावरून काढल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच बोलला

    follow whatsapp

    ADVERTISEMENT