व्यस्त वेळापत्रकाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, जाणून घ्या BCCI आणि कोहलीत काय वाद सुरु आहे?
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडला टेस्ट, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही मालिकांमध्ये पराभवाची धूळ चारली. काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर शेवटचा वन-डे सामना खेळवला गेला. या मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला. त्याआधी झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये भारताने ३-१ तर टी-२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवला होता. टीम इंडियाच्या या कामगिरीवर भारतीय प्लेअर्स […]
ADVERTISEMENT

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडला टेस्ट, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही मालिकांमध्ये पराभवाची धूळ चारली. काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर शेवटचा वन-डे सामना खेळवला गेला. या मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला. त्याआधी झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये भारताने ३-१ तर टी-२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवला होता. टीम इंडियाच्या या कामगिरीवर भारतीय प्लेअर्स खुश असले तरीही तिसऱ्या वन-डे सामन्यानंतर विराट कोहलीने केलेल्या एका वक्तव्यामुळे बीसीसीआय आणि कोहलीत एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या वन-डे सामन्यानंतर विराट कोहलीने भारतीय प्लेअर्ससाठीचा व्यस्त वेळापत्रकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेस आणला आहे.
काय म्हणाला होता विराट कोहली जाणून घ्या…
“भविष्यामध्ये वेळापत्रक आखण्याचा मुद्दा विचारात घेतला जायला हवा. प्रत्येक खेळाडूची मानसिक स्थिती एका वेळेला सारखीच असेल अशी तुम्ही अपेक्षा करु शकत नाही. कधीकधी तुम्हाला या वातावरणाचा उबग येतो आणि तुम्हाला बदलाची गरज असते. सलग दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत Bio Secure Bubble मध्ये राहणं आणि खेळणं सोपं नाही, भविष्यात हे अधिक कठीण होत जाईल. यावर चर्चा होऊन भविष्यात काहीतरी बदल घडेल अशी मला खात्री आहे.”
आता थांबायचं नाही…विराट कोहलीकडून IPL 2021 ची तयारी सुरु









