महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 156 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 03:56 PM • 25 Jun 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 138 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 57 लाख 72 हजार 799 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.94 टक्के इतके झाले आहे. आज दिवसभरात राज्यात 9 हजार 677 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात 156 […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 138 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 57 लाख 72 हजार 799 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.94 टक्के इतके झाले आहे. आज दिवसभरात राज्यात 9 हजार 677 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात 156 कोरोना बाधित मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के झाला आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 5 लाख 96 हजार 965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 17 हजार 35 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 33 हजार 748 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज आज घडीला 1 लाख 20 हजार 715 सक्रिय रूग्ण आहेत.

Corona संपेपर्यंत मुंबई लोकल बंदच राहणार-विजय वडेट्टीवार

आज नोंद झालेल्या एकूण 156 मृत्यूंपैकी 117 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 39 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 355 ने वाढली आहे. हे 355 मृत्यू, नाशिक -101, ठाणे-40, पुणे-35, सांगली-22, औरंगाबाद-21, उस्मानाबाद-21, लातूर-18, पालघर-14, कोल्हापूर-13, अहमदनगर-9, परभणी-9, नागपूर-7, सिंधुदुर्ग-7, रत्नागिरी-6, सोलापूर-5, अकोला-3, चंद्रपूर-3, सातारा-3, अमरावती-2, बीड-2, गडचिरोली-2, हिंगोली-2, जळगाव-2, रायगड-2, वर्धा-2, बुलढाणा-1, धुळे-1, जालना-1 आणि नंदूरबार-1 असे आहेत.

महाराष्ट्रात 10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई – 14 हजार 182

ठाणे- 16 हजार 466

पुणे – 17 हजार 562

कोल्हापूर- 10 हजार 537

महाराष्ट्रात कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी गेला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. तसंच डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यातले निर्बंधही काही प्रमाणात वाढवण्यात आले आहेत.

    follow whatsapp