PM Modi Pune: 'भटकती आत्मा...', पवारांबाबत PM मोदीचं विधान BJP ला आणणार अडचणीत?

मुंबई तक

29 Apr 2024 (अपडेटेड: 29 Apr 2024, 11:02 PM)

Lok Sabha Election 2024: भटकती आत्मा असा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पण याच टीकेचा भाजपला फटका बसणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

PM मोदीचं विधान BJP ला आणणार अडचणीत?

PM मोदीचं विधान BJP ला आणणार अडचणीत?

follow google news

Lok Sabha Election 2024 PM Modi Pune Sharad Pawar: पुणे: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) चा महाराष्ट्रात आता तिसरा टप्पा सुरू झाला आहे. ज्यामध्ये आता बरीच रंगत पाहायला मिळत आहे. त्यातच स्वत: पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' असं केलेलं विधान हे महाराष्ट्रात भाजपसाठी अडचणीचं ठरणार का? अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. (lok sabha election 2024 pune sabha wandering soul will pm modi statement about sharad pawar put bjp in trouble)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीसाठी बारामती आणि पुणे या मतदारसंघासाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात प्रचार सभा घेतली. याच सभेत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवारांचं नाव न घेता अत्यंत जहरी टीका त्यांच्यावर केली. 

'भटकती आत्मा' असा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सगळ्यात आधी आपण पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया. 

'महाराष्ट्राने अनेक काळ राजकारणातील स्थिरता पाहिली आहे. आज मला काही बोलण्याआधी.. मी जे काही बोलेल ते कोणी वैयक्तिक टोपी आपल्या डोक्यावर घेऊ नये..' 

आपल्याकडे काही 'भटकती आत्मा'... मोदींचा पवारांवर रोख

'आमच्याकडे असं म्हटलं जातं की, आपल्याकडे काही 'भटकती आत्मा' असतात.. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहतात ते आत्मे भटकत राहतात. स्वत:चं काही झालं नाही तर दुसऱ्यांच्या गोष्टी बिघडविण्यात त्यांना मजा येते.' 

'आमचा महाराष्ट्र देखील अशा भटकती आत्म्यांचा शिकार झाला आहे. आजपासून 45 वर्षांपूर्वी येथील एका मोठ्या नेत्याने स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र हा अस्थिरतेमध्ये गेला. यामुळेच अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाहीत.'

हे ही वाचा>> नकली शिवसेनेच्या टीकेवर ठाकरेंचा मोदींवर पलटवार

'2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा एवढा मोठा अपमान केला हे महाराष्ट्रातील जनता निश्चितच जाणून आहे. आज फक्त महाराष्ट्राला अस्थिर करणं हे या आत्म्याला समाधान मिळत नाही तर देशाला अस्थिर करण्याचा खेळ सुरू आहे.' 

'आज भारताला अशा भटकती आत्मापासून वाचवून देशात एक स्थिर, मजबूत सरकार देऊन पुढे जाणं गरजेचं आहे.' असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

मोदींचं विधान भाजपला महाराष्ट्रात ठरणार अडचणीच?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नेमका कोणाला कौल देणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, अद्यापही कोणालाच त्याचा नेमका अंदाज येऊ शकलेला नाही. 

2019 नंतर राज्यात आलेल नवं सरकार, त्यानंतर ठाकरेंचं पाडण्यात आलेलं सरकार आणि सगळ्यात शेवटी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने फुटले या सगळ्याचा महाराष्ट्रातील मतदारांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नेमकं काय आहे याचा थांगपत्ता लागणं आजच्या घडीला कठीण झालं आहे. 

अशातच शरद पवार हे वयाच्या 84 व्या वर्षी नवा पक्ष आणि चिन्ह घेऊन लोकांसमोर जात आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काही जणांना सहानुभूती वाटत असल्याचं अनेक सर्व्हेमधून दिसून आलं. अशावेळी पंतप्रधान मोदींनी आता जो 'भटकती आत्मा' हा उल्लेख केलाय त्याचा नेमका परिणाम काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा>> 'हे लोकं महिन्याभरात भयंकर घटना..', मोदींचा खळबळजनक आरोप

भटकती आत्मा असा उल्लेख करताना मोदींनी कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी राजकीयदृष्ट्या आणि तेही पुण्यातील सभेत मोदी नेमकं कोणाबाबत बोलत आहेत हे मतदारांना नक्की उमगलं आहे. अशावेळी आता मोदींचं ते विधान भाजपला अडचणीचं ठरणार का की भाजपचा मतदार अधिक जोमाने मतदान करणार याबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे. 

'शरद पवारांचा ERA संपला', असं म्हणणं पडलेलं महागात

2019 विधानसभा निवडणुकीआधी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की, 'शरद पवारांचा ERA म्हणजेच काळ संपला आहे.' पण त्यांच्या याच विधानामुळे राज्यात शरद पवारांच्या बाजूने एक वातावरण तयार झालेलं. ज्याचा पवारांनी देखील अचूकपणे फायदा उचलला. त्यातच मतदानाच्या अगदी शेवटच्या क्षणी साताऱ्यातील पावसाच्या सभेने पवारांना या सगळ्यावर कळसच चढवला. 

एक तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत दिग्गज नेते उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी पराभव केला तर दुसरीकडे राज्यात 50 हून अधिक जागा मिळवत भाजपला 105 वरच रोखण्यात पवारांना यश आलं होतं. 

यामुळेच आता स्वत: पंतप्रधान मोदींनी जे भटकती आत्मा असा उल्लेख केलाय त्याचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp