Nashik Bus Fire : बसला आग लागून मोठा अपघात, ११ जणांचा होरपळून मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती

मुंबई तक

• 01:59 AM • 08 Oct 2022

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठा अपघात झाला आहे. खासगी बसला भीषण आग लागल्याने ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहेत. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या अपघातात बसला आग लागली. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातली मृतांची संख्याही वाढण्याची भीती […]

Mumbaitak
follow google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

हे वाचलं का?

महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये मोठा अपघात झाला आहे. खासगी बसला भीषण आग लागल्याने ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३८ जण जखमी झाले आहेत. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या अपघातात बसला आग लागली. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातली मृतांची संख्याही वाढण्याची भीती आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. औरंगाबाद रोडवर ही घटना घडली.

नेमकी काय घडली घटना?

यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला नाशिक जवळ भीषण अपघात झाला. ही खासगी बस चिंतामणी ट्रॅव्हल्सची होती असं समजतं आहे. धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक लागली त्यानंतर या बसने पेट घेतला. ही खासगी बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने चालली होती. या बस अपघातात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेतील जखमींना अग्नीशमन दलाकडून शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात ३८ जण जखमी झाले आहेत.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर झाला अपघात

नाशिक औरंगाबाद रस्त्यावर ही घटना घडली आहे. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरच्या हॉटेल मिरची चौकात ही घटना आज पहाटे घडली. पहाटे ४.३० च्या सुमाराला ही घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

ही बस यवतमाळहून मुंबईला चालली होती. या बसमध्ये साधारण ३० प्रवासी होते. पोलिसांनी ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे असं ट्रॅव्हल्स एजंट शशिकांत देशपांडे यांनी सांगितलं. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शशिकांत देशपांडे हे घटनास्थळी आले. त्यांनी मीडियाशी बोलताना ही सगळी माहिती दिली. यातल्या प्रवाशांची नावं समजू शकलेली नाही. मात्र ही बस यवतमाळचीच होती. बसमधले काही जण हे मुंबईला जाणारे होते तर काहीजण नाशिकला उतरणार होते अशीही माहिती देशपांडे यांनी दिली.

DCP अमोल तांबे यांनी काय माहिती दिली?

आज पहाटे नाशिकमधल्या मिरची चौकात एक ट्रॅव्हल बस आणि ट्रेलर यांचा अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. ३८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दलाचं पथक हे सगळं घटनास्थळी आलं आहे. हा अपघात नेमका कसा झाला आणि अपघातानंतर बसला आग कशी लागली याची माहिती आम्ही घेत आहोत असंही डीसीपी अमोल तांबे यांनी सांगितलं.

    follow whatsapp