ShivJayanti : ‘महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही…’; राज ठाकरेंनी दिली शपथ

मुंबई तक

• 07:37 AM • 21 Mar 2022

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी केली जात असून, यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील दादर भागात असलेल्या शिवाजी पार्कात कार्यक्रमाचं आयोजन केलं. या सोहळ्याला हजारो मनसैनिकांसह नागरिक उपस्थित होते. शिवजयंती निमित्त मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली. संपूर्ण परिसराची सजावट करण्यात आली असून, यानिमित्ताने हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टीही करण्यात […]

Mumbaitak
follow google news

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती साजरी केली जात असून, यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील दादर भागात असलेल्या शिवाजी पार्कात कार्यक्रमाचं आयोजन केलं. या सोहळ्याला हजारो मनसैनिकांसह नागरिक उपस्थित होते.

हे वाचलं का?

शिवजयंती निमित्त मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली. संपूर्ण परिसराची सजावट करण्यात आली असून, यानिमित्ताने हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व मनसैनिकांना शपथ दिली.

काय म्हणाले राज ठाकरे?

“आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे शिवतीर्थावर जमलो आहोत. मी आज सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. मी इथे शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांना पक्षातर्फे शपथ देणार आहे. ती शपथ माझ्याबरोबर घ्या,” असं म्हणत राज ठाकरेंनी उपस्थितांना शपथ दिली.

काय आहे शपथ?

“आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जातीजातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल. राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल. त्यांचा आत्मसन्मान राहिल. युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल. इथलं प्रत्येक मुल शाळेत जाऊन शिकत असेल. लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल. इथली शहरं, गावं, पाडे, तांडे सुंदर, सुखद आणि सुरक्षित असतील.”

“भ्रष्टाचार नष्ट होईल. आमच्या शेतकरी बंधूभगिनींना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल. कामगारांना न्याय मिळेल, यासाठी जे पडेल, ते करू. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी, स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्यांचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत. सैनिक आहोत, यांचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची संपूर्ण निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.”

    follow whatsapp