समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन?; नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दारू विक्रीचा परवाना घेतल्याचा दावा मलिकांनी केला असून, समीर वानखेडेंनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक म्हणाले, “समीर वानखेडेंनी आणखी फसवेगिरी केली आहे. त्यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. बोगसगिरी करण्यात ते माहिर होते. त्यांनी १९९७-९८चं जिल्ह्याचं नोंदवही आहे. त्यात हॉटेल सद्गुरू नावे बारचं लायसन्स देण्यात आलेलं आहे. जे लायसन्स देण्यात आलं ते समीर ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे आहे. त्या परवान्याचे सातत्याने समीर वानखेडेंच्या नावान नुतनीकरण केलं गेलं आहे. २०२२ पर्यंत नुतनीकरण करण्यात आलेलं आहे.”

“हे लायसन्स देताना समीर दाऊद वानखेडे यांचं वय त्यावेळी १७ वर्ष १० महिने आणि १९ दिवस इतकं होतं. त्यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत होते. एका अल्पवयीन मुलाच्या नावे लायसन्स देण्याचं काम झालं, हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. १७ वर्ष १० महिने आणि १९ महिने वय असताना हे दिलं गेलं, जेव्हा की १८ वर्षा खालील व्यक्तीला लायसन्स दिलं जात नाही. या लायसनवर वाशीमध्ये हॉटेल सदगुरू सुरू आहे.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“१९९७ पासून ते आजपर्यंत म्हणजे २४-२५ वर्ष झाले. एकदाही ते लायसन्स सस्पेंड झालेलं नाही. एकदाही असं झालेलं नाही की, त्यावरचा व्यवसाय बंद होता. त्यांनी घोटाळा करून लायसन्स घेतलं आणि समीर वानखेडेच्या नावे तो बार सुरू आहे.”

“समीर वानखेडेंनी स्वतःच्या संपत्तीचं विवरण पत्र भरलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की, ठाणे नवी मुंबईतील सदगुरू ट्रक टर्मिनस हॉटेल १९९५ ची किंमत १ कोटी. हे त्यांच्या आईवडिलांकडून ती मिळालेली असून, त्याचं भाडं वर्षाला २ लाख ४० इतकं येतं. त्यानंतर त्यांनी अलिकडेच त्यांच्या विभागाला माहिती दिली की, वडील ज्ञानदेव वानखेडे आणि स्वतः अशी ही संयुक्त प्रॉपर्टी असून, २ लाख ४० हजार भाडे येत आहे. २४ वर्षांपासून समीर वानखेडेंच्या नावे घोळ केला जात आहे.”

ADVERTISEMENT

“केंद्र सरकारचे जे अधिकारी असतात, त्यांना वर्षाला संपत्तीची माहिती द्यावी लागते. नोकरी मिळवताना त्यांनी ही माहिती लपवली. २०१७ पर्यंत त्यांनी ही माहिती लपवली. २०१७ नंतर जी माहिती दिली, तीही खोटी दिली गेली. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जे सेवा नियम आहेत, त्यानुसार कोणताही अधिकारी सेवेत असताना व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने या गोष्टी झाल्या आहेत, हा सगळा घोटाळा आहे.”

ADVERTISEMENT

समीर वानखेडे अडचणीत?; नवाब मलिकांनी बोगस जातप्रमाणपत्राबद्दल केला मोठा खुलासा

“समीर वानखेडे यांनी जाणीवपूर्वक माहिती दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. केंद्राचे जे नियम आहेत, त्यानुसार यांना सरकारी नोकरीवर राहण्याचा अधिकार नाही. आम्ही तीन-चार दिवसानंतर डीओपीटीओकडे याची तक्रार करणार आहोत. उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार करणार. दक्षता विभागाकडेही तक्रार करणार. तीन प्रकरणात समीर वानखेडे अडकले आहेत. पहिलं प्रकरण आर्यन खान प्रकरणात वसुली करण्याचा, खोटे जातप्रमाणपत्र आणि तिसरं अल्पवयीन असतानाच बार चालवणं. याची माहिती सरकारला दिली गेली नाही. हे घोटाळेबाज लोक आहेत. नाव बदलण्यापासून ते नोकरी मिळवण्यापर्यंत यांनी फसवेगिरी केली आहे. समीर वानखेडेंची नोकरीही जाणार आणि ते तुरुंगातही जातील”, असा दावा मलिक यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT