Maharashtra Vaccination: लसीकरण कधीपर्यंत सुरळीत होणार?, महाराष्ट्रातील जनतेचा सवाल!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आदळल्यावर लसीकरण (Vaccination) हे किती महत्त्वाचं आहे हे आतापर्यंत प्रत्येकाला पटलं आहे. जेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण होईल तेवढ्याच लवकर आपण कोरोनापासून (Corona) मुक्त होऊ हे स्पष्ट आहे. अशावेळी आता राज्यातील जनता देखील लसीकरणासाठी जागरुक झाली आहे. पण महाराष्ट्रात (Maharashtra) अद्याप तरी म्हणावं तेवढ्या वेगाने लसीकरण काही होऊ शकलेलं नाही. आता तर महाराष्ट्र सरकारकडे लसीचे डोसच पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबविण्यात आलं आहे. अशावेळी लसीकरण कधीपर्यंत सुरळीत होणार? असा सवाल आता महाराष्ट्रातील जनता विचारु लागली आहे. (How long will vaccination be smooth in Maharashtra Question of the people of Maharashtra)

1 एप्रिल 2021 पासून 45 वयाच्या वरील नागरिकांना लसीकरण सुरु झालं. सुरुवातीच्या काही दिवसात लसीकरण हे बऱ्यापैकी पार पडलं. पण जसजसं लोकांमध्ये याबाबत जागरुकता वाढू लागली तसतंस महाराष्ट्रात लसींचा तुटवडा हा जाणवायला लागला. बऱ्याचदा तर काही ठिकाणी लसीकरण केंद्र ही बंद देखील ठेवावी लागली. मात्र असं असतानाचा लस उत्पादनाबाबतची नेमकी परिस्थिती जाणून न घेताच केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली. ती म्हणजे 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण. खरं तर हा सरकारचा धाडसी निर्णयच होता. कारण 45 वयाच्या वरील नागरिकांनाच लस देण्यात अडथळा येत होता. कारण लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नव्हता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र, असं असताना देखील केंद्र सरकारने 18 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण हे सुरु केलं. पण अवघ्या 11 दिवसातच महाराष्ट्रात त्याला ब्रेक लागला. 45 वयाच्या वरील ज्या लाखो नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्या नागरिकांना अद्याप दुसरा डोस मिळू शकलेला नाही. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवून ते 45 वयाच्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार आहे.

महाराष्ट्रातला Lockdown संपेल का? कोरोनाची स्थिती काय? डॉ. राहुल पंडित यांनी दिलं उत्तर

ADVERTISEMENT

दरम्यान, राजकीय पातळीवर याबाबत एकमेकांकडे बोट दाखवलं जात असल्याने लसीकरणाबाबत नेमकी कोणतीची स्पष्टता नसल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्रातील सरकारच्या मते, केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लस पुरवत नसल्याने लसीकरण होऊ शकलेलं नाही. तर दुसरीकडे केंद्रातील किंवा राज्यातील भाजप नेत्यांच्या मते, महाराष्ट्राला लसींचा पुरवठा योग्यरित्या केला जात आहे. यावेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असले तरीही महाराष्ट्रात लसीकरण वेगाने होत नाही हे सत्य आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता विचारतेय की लसीकरण सुरळीत कधी होणार?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आतापर्यंत किती लसीकरण झालं आहे?

महाराष्ट्रात कालपर्यंत (11 मे) 1 कोटी 86 लाख 21 हजार 485 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा विचार केलास लसीकरणाचा हा आकडा फारच कमी आहे. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ही 12 कोटींहून अधिक आहे. त्यात 18 वर्षावरील लोकांची संख्या ही साधारण 8 कोटींच्या घरात आहे. त्या तुलनेने गेल्या तीन महिन्यात झालेलं लसीकरण हे फारच कमी आहे. एवढंच नव्हे तर मागील काही दिवसात लसीकरणाचा वेग हा प्रचंड मंदावला आहे. 19 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 1 कोटी 22 लाख 73 हजार 973 लसीचे डोस देण्यात आले होते. आता साधारण एक महिना होत आलेला असताना यात फक्त 64 लाखांची भर पडली आहे. त्यामुळे लसीकरणाचा हा वेग फारच कमी आहे.

Covishield चा एक डोस मृत्यूचा धोका 80 टक्क्याने करतो कमी: रिसर्च

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 04 हजार 133 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर लसीचा दुसरा डोस हा 36 लाख 44 हजार 405 जणांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 1 कोटी 86 लाख 48 हजार 538 लसींचे डोस दिले गेले आहेत. भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबतची संपूर्ण आकडेवारी ही आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

या सगळ्या आकडेवारीवरुन आपल्याला लक्षात येईल की, मागील काही दिवसात लसीकरण हे फारच कमी प्रमाणात होत आहे. ज्यावेळेस लसीकरणाचा वेग वाढवायला हवा त्याच वेळेस सरकारकडून लसीकरण कमी होताना दिसत आहे. ज्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

लसींचं उत्पादन केव्हा वाढणार?

देशात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोनच लसी दिल्या जात आहेत. आता लवकरच रशियन बनावटीची स्पुटिनिक-V ही लस देखील दिली जाणार आहे. पण सध्या भारतात सर्वाधिक कोव्हिशिल्ड ही लस नागरिकांना दिली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट ही भारतातील अग्रगण्य अशी कंपनी आहे जी कोव्हिशिल्डचं उत्पादन करीत आहे. त्यामुळे सीरमने अतिशय वेगाने लसीचं उत्पादन करावं अशीच सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, असं असलं तरी सीरमच्या लसीकरणाचा वेग हा फारच कमी असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षभरात अदर पूनावाला यांनी अतिशय आत्मविश्वासाने सांगितलं होतं की, त्यांची कंपनी मोठ्या प्रमाणात कोव्हिशिल्डचं उत्पादन करेल. ऑक्टोबर 2020 मध्ये ते म्हणाले की, SIIने साठवणुकीच्या उद्देशाने सुमारे 5 कोटी डोस तयार केले आहेत. जानेवारीपर्यंत त्यांची कंपनी एकूण 10 कोटी डोस तयार करेल. दरम्यान, एका महिन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरमच्या मुख्यालयाला भेट दिली होती तेव्हा पूनावाला म्हणाले होते की, मार्च महिन्यापर्यंत त्यांची कंपनी 10 कोटी डोसची दर महिन्याला निर्मिती करेल. मात्र, आता मे महिना उजाडला आहे आणि SIIची उत्पादन क्षमता ही दर महिन्याला सुमारे 7 कोटी डोस इतकीच राहिली आहे.

आता दोन वर्षावरील मुलांवर देखील कोरोना लसीची होणार चाचणी, भारत बायोटेकला मंजुरी

ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली असता राज्यातील लसीकरण कधी सुरळीत होईल याबाबत राजकीय पक्षांकडून कोणीही बोलण्यास तयार नाही. पण जर आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे असतील तर कोणत्याही परिस्थिती लसीकरणाचा वेग हा झपाट्याने वाढवावाच लागेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT