Lockdown : आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई तक

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आता लॉकडाउनशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आता लॉकडाउन लावलं नाही तर येणाऱ्या १५-२० दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल असे सूचक संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. …तर लॉकडाउन करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं – खासदार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लावलं जाण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आता लॉकडाउनशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आता लॉकडाउन लावलं नाही तर येणाऱ्या १५-२० दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल असे सूचक संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

…तर लॉकडाउन करणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं – खासदार उदयनराजे

सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातली वाढती रुग्णसंख्या पाहता आताच कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचं बोलून दाखवलं, “आताच लॉकडाउन लावला तर परिस्थिती महिन्याभरात नियंत्रणात येईल. लॉकडाउनशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाहीये. येणाऱ्या १५-२० दिवसांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल. त्यामुळे लॉकडाउन जाहीर करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. सध्या कोरोनाची साखळी मोडणं गरजेचं आहे.” लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण होत आहे. यावर नियंत्रण मिळवायचं असल्यास लॉकडाउन लावण्याची हीच वेळ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

पुणे : महाराष्ट्राला लसीची कमतरता भासणार नाही – प्रकाश जावडेकरांचं आश्वासन

हे वाचलं का?

    follow whatsapp