महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 187 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 859 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 61 लाख 30 हजार 137 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.66 टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात 5 हजार 539 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 5 हजार 859 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 61 लाख 30 हजार 137 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.66 टक्के इतके झाले आहे. आज महाराष्ट्रात 5 हजार 539 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 91 लाख 72 हजार 531 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 41 हजार 759 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 35 हजार 516 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 837 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 74 हजार 483 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 5 हजार 539 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 63 लाख 61 हजार 759 इतकी झाली आहे.
मुंबईत 309 नवे रूग्ण
मुंबईत कोरोनाचे 309 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 407 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 14 हजार 166 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट 97 टक्के इका झाला आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 4345 सक्रिय रूग्ण आहेत. तर मुंबईचा डबलिंग रेट 1631 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात 185 नवे रूग्ण
पुण्यात कोरोनाचे 185 नवे रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. तर 237 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात पाच जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. पुण्यात 2391 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात आत्तापर्यंत 4 लाख 77 हजार 285 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. पुण्यात आत्तापर्यंत एकूण 8802 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे.
भंडारा जिल्हा कोरोनामुक्त
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याने मोठं यश प्राप्त केलं आहे. ट्रेसिंग, टेस्ट आणि ट्रिटमेंट या त्रिसुत्रीच्या सोबतच योग्य नियोजन आणि सामुहिक प्रयत्नांच्या जोरावर जिल्हा प्रशासनाने ही किमया साधून दाखवली आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या एकमेव रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून १५ महिन्यांनी जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.