महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक, गेल्या 24 तासात सापडले ‘एवढे’ पॉझिटिव्ह रुग्ण
मुंबई: गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. कारण मागील 24 तासातील राज्यात तब्बल 57 हजार 074 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 222 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारची चिंता अधिकच वाढली आहे. या सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आता राज्यात सध्या 4 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. […]
ADVERTISEMENT

मुंबई: गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. कारण मागील 24 तासातील राज्यात तब्बल 57 हजार 074 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 222 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारची चिंता अधिकच वाढली आहे. या सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आता राज्यात सध्या 4 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर सध्या प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
या सगळ्या गोष्टींचा विचार करुन आज राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कठोर निर्णय उद्या (5 एप्रिल) रात्री 8 वाजेपासून लागू होणार आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी जवळपास बंद राहणार आहेत.
कठोर निर्बंध… म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद राहणार पाहा अगदी सविस्तरपणे
दरम्यान, राज्यात आज 27,508 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 25,22,823 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.08 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 222 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के एवढा आहे.









