Sachin Vaze Case: ‘वर्षा’वर मध्यरात्रीपर्यंत खलबतं, CMची ‘यांच्यासोबत’ 4 तास चर्चा
मुंबई: एकीकडे सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांवर निशाणा साधला आहे. या सगळ्या प्रकरणी ठाकरे सरकार नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल (16 मार्च) रात्री एक बैठक घेतली. ज्यामध्ये तब्बल 4 तास खलबतं सुरु होती. मुख्यमंत्री उद्धव […]
ADVERTISEMENT

मुंबई: एकीकडे सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांवर निशाणा साधला आहे. या सगळ्या प्रकरणी ठाकरे सरकार नेमके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल (16 मार्च) रात्री एक बैठक घेतली. ज्यामध्ये तब्बल 4 तास खलबतं सुरु होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, डीजीपी हेमंत नागराळे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत 4 तासांहून अधिक चर्चा केली. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय बंगल्यावर पार पडली. मुख्यमंत्र्यांची ही बैठक काल रात्री 8 वाजता सुरु झाली होती. जी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास संपली.
दरम्यान, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली किंवा कोणते निर्णय घेण्यात आले याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एवढंच नव्हे तर या बैठकीनंतर गृहमंत्री किंवा दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियासमोर येऊन कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे या बैठकीत निश्चितच काही तरी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sachin Vaze प्रकरणाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही-शरद पवार










