Twitter ने भारतातले कायदे आणि नियम ठरवू नये, मोदी सरकारने सुनावलं

मुंबई तक

WhatsAPP ने केंद्र सरकारविरोधात कोर्टात धाव घेतल्यानंतर आता Twitter आणि मोदी सरकार यांच्यात वाद रंगला आहे. Twitter ने केंद्र सरकारचे डिजिटल नियम आणि ऑफिसमध्ये पोलीस गेल्यामुळे सरकारवर टीका केली. आता सरकारने म्हटलं आहे की Twitter घरातले भारत सरकारचे नियम आणि कायदे ठरवण्याची गरज नाही म्हणत ट्विटरला खडे बोल सुनावले आहे. एवढंच नाही तर ट्विटरने केलेलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

WhatsAPP ने केंद्र सरकारविरोधात कोर्टात धाव घेतल्यानंतर आता Twitter आणि मोदी सरकार यांच्यात वाद रंगला आहे. Twitter ने केंद्र सरकारचे डिजिटल नियम आणि ऑफिसमध्ये पोलीस गेल्यामुळे सरकारवर टीका केली. आता सरकारने म्हटलं आहे की Twitter घरातले भारत सरकारचे नियम आणि कायदे ठरवण्याची गरज नाही म्हणत ट्विटरला खडे बोल सुनावले आहे. एवढंच नाही तर ट्विटरने केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आणि भारताला बदनाम करणारं आहे असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

एवढंच नाही तर IT मंत्रालयाने ट्विट करत हेदेखील म्हटलं आहे की ट्विटरने केलेला धमकावण्याचा आरोप सपशेल चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ट्विटरकडून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशावर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भारतातल्या कायदा सुव्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करू नये. Twitter च नाही तर सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या भारतात आहे त्यांचे प्रतिनिधी सुरक्षितच राहणार आहेत त्यांना मोदी सरकारकडून कोणताही धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Right to Privacy हा प्रत्येकाचा मौलिक अधिकार, What’s App च्या याचिकेवर केंद्र सरकारचं कोर्टात उत्तर

काय म्हटलं होतं Twitter ने?

हे वाचलं का?