'चिल्लर लोक' म्हणत गोरंट्यालांनी डिवचलं, खोतकरांनी थेट आरेतुरे केली, राडा!

मुंबई तक

जालन्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्यावरून राजकीय द्वंद्व चांगलं रंगले आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना सवाल केला असून गोरंट्याल यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

जालन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्यावरून राजकीय वादंग पेटले आहेत. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना विचारलं की, 'आपण सरकारमध्ये आहे का?' त्यावर आमदार गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं की जालन्याच्या जनतेने पाठिंबा दिला म्हणून ते वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करु शकले. गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर टीका केली आणि म्हटलं की, 'खोतकर 20 वर्षांत 10 वर्ष मंत्री होते, परंतु त्यांच्या घरासमोरील नालाही सुधारू शकले नाहीत.' या आरोप-प्रत्यारोपांमुळे जालन्याच्या राजकारणात अतिशय तीव्र संघर्ष बघायला मिळत आहे.

    follow whatsapp