India vs Pakistan, Asia Cup 2023: भारत पाकिस्तान पुन्हा भिडणार! कसं ते जाणून घ्या - Mumbai Tak - asia cup 2023 equations of india and pakistan reaching the final - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

India vs Pakistan, Asia Cup 2023: भारत पाकिस्तान पुन्हा भिडणार! कसं ते जाणून घ्या

Asia Cup 2023, India vs Pakistan : भारत पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने. आशिया कपमध्ये अंतिम सामना होऊ शकतो भारत आणि पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानला शेवटचा सामना 14 रोजी होणार आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर त्यांचा अंतिम फेरीत भारताशी सामना होणार आहे.
Updated At: Sep 12, 2023 17:52 PM
India vs Pakistan, Asia Cup 2023: Pakistan will have to defeat Sri Lanka in its last match in Super-4. If both the matches give similar results, then the clash between India and Pakistan in the final will be confirmed.

Asia Cup 2023, India vs Pakistan : आशिया कप 2023 मधील सुपर-4 चा थरार शिगेला पोहोचलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. पहिला सामना पावसात वाहून गेला. पण सुपर-4 मध्ये दुसऱ्यांदा सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यामुळे सुपर-4 च्या गुणतालिकेत उत्कंठा वाढली आहे. पण यासोबतच चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध हरवून भारत अंतिम फेरीत पोहोचणार?

क्रिकेट चाहत्यांना आता आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामनाही पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये ही टक्कर होऊ शकते. हा विजेतेपदाचा सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्येच खेळवला जाईल.

हेही वाचा >> विराट-राहुलचा शतकी धमाका, पाकिस्तान विरुद्धच्य सामन्यात विराट ठरला वेगवान फलंदाज

भारतीय संघाला आज (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 मध्ये दुसरा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. असे झाल्यास सुपर-4 मधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला श्रीलंकेचा पराभव करावा लागेल. दोन्ही सामन्यांचा निकाल सारखाच लागला तर अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना निश्चित होईल.

सुपर-4 ची गुण तालिका

भारत – 1 सामना – 2 गुण, 4.560 नेट रनरेट
श्रीलंका – 1 सामना – 2 गुण, 0.420 नेट रनरेट
पाकिस्तान – 2 सामने – 2 गुण, -1.892 नेट रनरेट
बांगलादेश – 2 सामने – 0 गुण, -0.749 नेट रनरेट

टीम इंडिया आणखी दोन सामने खेळणार

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाला सुपर-4 फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. या फेरीतील संघाचा दुसरा सामना आज (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. यानंतर तिसरा सामना बांगलादेशविरुद्ध (15 सप्टेंबर) होईल. तर पाकिस्तानचा शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आहे.

भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार… समीकरण समजून घ्या

1) भारतीय संघाने श्रीलंकेला हरवले तर अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. यानंतर टीम इंडियाला बांगलादेशसोबतही सामना खेळावा लागणार आहे, जो औपचारिक असणार आहे.

2) पाकिस्तानला शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. बाबर आझमच्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर त्यांचा अंतिम फेरीत भारताशी सामना होईल.

हेही वाचा >> Maratha Reservation : असा आहे मराठा आरक्षणाचा इतिहास?

3) पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर तर दोन्ही संघांचे 3-3 गुण असतील. त्यानंतर नेट रन रेट महत्त्वाचं असेल. या आधारावर श्रीलंका पात्र ठरेल, कारण त्यांचा नेट रनरेट चांगला आहे.

4) पुढच्या सामन्यात श्रीलंकेने भारताला हरवले तर टीम इंडियाला बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत पोहोचण्याची पूर्ण आशा असेल. पण अंतिम फेरीसाठी पाकिस्तानला त्यांच्या पुढच्या सामन्यात श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागेल.

 

Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात चिकन खा अन् Weight Loss करा! कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी स्वत:साठी फक्त 5 मिनिटे काढा अन् दिवसाची सुरूवात ‘या’ 8 योगा स्टेप्सने करा! झटपट Weight Loss करायचंय? मग ‘हे’ 8 Snacks खाऊनच बघा… ‘गाव की गोरी बनली, शहर की छोरी’; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन अभिनेत्रीचा फुल ऑन फायर हॉट फिगर; कारण फॉलो करते ‘हा’ Diet Plan 162 किलोच्या IT इंजिनिअरने घटवलं 65 किलो वजन; कोणता सीक्रेट डाएट केला फॉलो? Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण?