…तर भारताला मिळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश

मुंबई तक

India vs Australia 3rd Test: भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia) यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून (1 मार्च) इंदूरमध्ये (Indore) खेळवला जात आहे. सकाळी 9.30 पासून सामना सुरू झाला आहे. (ICC World Test Championship) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतीय संघासाठी खूप खास आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून 4 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India vs Australia 3rd Test: भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia) यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून (1 मार्च) इंदूरमध्ये (Indore) खेळवला जात आहे. सकाळी 9.30 पासून सामना सुरू झाला आहे. (ICC World Test Championship) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतीय संघासाठी खूप खास आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. Indian team lead 2-0 against Australia

Ind Vs Aus : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ संकटात; 50 धावात निम्मा संघ तंबूत

आता जर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचे असेल तर त्यांना मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकावा लागेल. म्हणजेच या इंदूर कसोटीत भारतीय संघाने विजयाची नोंद केली तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश करेल.

भारतीय संघाला एक सामना जिंकणे आवश्यक आहे

मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर आता भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत आतापर्यंत 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत. संघाने 4 पराभव आणि 2 अनिर्णित सामने खेळले आहेत. तसेच, भारत 64.06 पॉइंट टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp