भारतात पुन्हा एकदा 500 रुपयांच्या नोटांबाबत सस्पेन्स आणि राजकीय गोंधळ वाढला आहे. 27 मे 2025 रोजी टीडीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या भाषणाने सुरू झालेला वाद आता आणखी तीव्र होत चालला आहे. त्यांनी दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा 500 रुपयांच्या नोटांवर बंदी घालावी आणि फक्त 100, 200 किंवा त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटा चलनात राहाव्यात अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नायडू म्हणाले की, "मोठ्या नोटा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात, त्यांच्यावर बंदी घालावी." त्यांचा असा विश्वास आहे की छोट्या नोटांद्वारे व्यवहार नियंत्रित करूनच भ्रष्टाचाराला आळा घालता येईल.
'2016 च्या नोटाबंदीची मूळ कल्पना त्यांनीच दिली होती, जरी मोदी सरकारने कधीही औपचारिकपणे त्यावर सहमती दर्शवली नाही', असाही त्यांनी पुनरुच्चार केला.
500 रुपयांच्या नोटेचे महत्त्व काय आहे?
- 500 रुपयांच्या नोटा सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वाधिक प्रसारित होणारी नोट आहे.
- मार्च 2020 मध्ये त्याचा बाजारातील वाटा 60% होता
- मार्च 2024 मध्ये तो 86.5% पर्यंत वाढला
एकट्या 500 च्या नोटांचे मूल्य चलनात असलेल्या एकूण 34.8 ट्रिलियन रुपयांच्या चलनापैकी 30 ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त आहे.
आरबीआयच्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे की, 500 ची नोट आता व्यवस्थेचा कणा बनली आहे, विशेषतः जेव्हा 2000 ची नोट चलनातून बाहेर पडली आहे.
खोट्या बातम्या, राजकारण आणि दबाव
टीडीपीच्या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांच्या भाषणानंतर एका आठवड्याने, एका यूट्यूब चॅनेलने दावा केला की मार्च 2026 पासून 500 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली जाईल. पीआयबीने या दाव्याला फेक न्यूज म्हटले आहे. त्यानंतर, 500 रुपयांच्या नोटांवरील बंदीबद्दलची चर्चा थांबायला हवी होती. पण एका आठवड्यानंतर, चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा 500 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची मागणी करून सरकारवर दबाव आणला. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
2016 मध्ये झालेली नोटाबंदी
2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी जेव्हा नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा त्यांनी ते भ्रष्टाचाराविरुद्धचे मोठे पाऊल असल्याचं म्हटलं होतं. आजही, 8 वर्षांनंतर, नोटाबंदीने काय साध्य केले यावर चर्चा सुरू आहे. 2000 रुपयांच्या नोटांवरून वाद सुरू झाला कारण ती सर्वाधिक मूल्य असणारी नोट बाजारात आली होती.
दरम्यान, मे 2023 मध्ये आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावेळी सुमारे 3.5 लाख कोटी किंमतीच्या 2000 रुपयांच्या नोटा बाजारात होत्या. आरबीआयने दावा केला होता की, 2000 रुपयांच्या 97 टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या आहेत. परंतु परत न आलेल्या 3 टक्के नोटांची किंमत 7 हजार 261 कोटी असल्याचे सांगितले जाते. आरबीआय बाजारात 2000 रुपयांच्या नवीन नोटा पुरवत नाही परंतु चलनात असलेल्या नोटा अजूनही वैध किंवा कायदेशीर आहेत.
नोटाबंदीत जुनी 500 रुपयांची नोट देखील बंद करण्यात आली. नवीन नोट चलनात आली जी राखाडी रंगाची आहे आणि तिचा आकार 66 मिमी x 150 मिमी आहे. त्याची थीम हेरिटेज साइट्स आहे आणि दिल्लीचा लाल किल्ला त्यावर बनवला आहे. त्यावर निवृत्त आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची स्वाक्षरी आहे.
ADVERTISEMENT
