Maharashtra weather Update : हवामान विभागाने आणि इतर हवामान अंदाज दर्शवणाऱ्या संस्थांनी 8 जून रोजीच्या हवामानाचा अंदाज वर्तवला. ज्यात मान्सूनचा प्रभाव कायम राहणार आहे, विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूनचा प्रभाव कायम राहिल. त्याचप्रमाणे इतर अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता असणार आहे. विशेषत: घाटमाथा आणि कोकणात पावसाची शक्यता असणार आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिचंच मुंडकं छाटून पोलीस ठाण्यात नेलं; 'त्याच्याशी' शारीरिक संबंध अन्...
हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर 8 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने 8 ते 11 जून दरम्यान, मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
8 जून रोजी पावसाची परिस्थिती
त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरपैकी पुणे आणि साताऱ्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने घाटमाथ्यावर म्हणजेच महाबळेश्वर आणि लोणावळ्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची स्थिती
मराठवाड्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस धुमाकूळ घालणार आहे. त्याचप्रमाणात विदर्भातील नागपूर, अमरावती आणि यवतमाळ भागात पावसाचा जोर हा तुलनेनं कमी असेल. तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील मान्सून स्थिती
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगावात काही अंशी पाऊस राहणार आहे. तसेच अहमदनगर आणि नाशकात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये खासकरुन पुणे, सातारा, रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी अनेकांनी सावधानता बाळगावी आणि त्या ठिकाणी कोणीही जाऊ नये.
हेही वाचा : Mumbai Weather: मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पुढील 3 तासांसाठी Red अलर्ट जारी
त्याचप्रमाणे शेतीसाठी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. 12 जूननंतर राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
