घरी एकटीच असताना प्रेयसीने बॉयफ्रेंडला बोलावलं, रात्रीत घडलं भलतंच काही.. सकाळी थेट बनला तरुणीचा पती!

Viral News: एका मुलीने घरी कोण नसताना तिच्या प्रियकराला घरी बोलावलं. पण त्यानंतर अशा काही घडामोडी घडल्या की, दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियकर थेट तरुणीचा पतीच बनला

रात्री घरी एकटीच असलेल्या प्रेयसीने बॉयफ्रेंडला गुपचूप बोलावलं (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

रात्री घरी एकटीच असलेल्या प्रेयसीने बॉयफ्रेंडला गुपचूप बोलावलं (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

07 Jun 2025 (अपडेटेड: 07 Jun 2025, 06:06 PM)

follow google news

उत्तराखंड: उत्तराखंडमधील एका तरुणाने गुरुवारी (5 जून) रात्री ठाकूरद्वारा येथील एका गावात असलेल्या त्याच्या प्रेयसीच्या घरी तिला भेटण्यासाठी पोहोचला. पण रात्रीच्या वेळी मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांनाही खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. ज्यानंतर संपूर्ण घटनेला एक वेगळीच कलाटणी मिळाली. सुरुवातीला मुलीकडील कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर सकाळी पंचायतीसमोर दोघांचं लग्न लावण्यात आलं.घरी कोणीही नव्हते, 

हे वाचलं का?

प्रेयसीने प्रियकराला बोलावले घरी, पण...

ठाकूरद्वारा येथील गाववाडी या गावातील एका मुलीचे उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथील एका तरुणाशी मागील एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. मुलीचे कुटुंबीय काही कामासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे मुलीने तिच्या प्रियकराला रात्री भेटण्यासाठी घरी बोलावले. रात्री दोघेही एका खोलीत असताना होते. तिचे कुटुंबीय हे अचानक घरी परतले. त्याच वेळी त्यांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं.  त्यानंतर त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनी या घटनेबाबत माहिती देत तिच्या आई-वडिलांनी घरी बोलावून घेतलं.

हे ही वाचा>> विद्यार्थ्याने शिक्षकाला घरी बोलावलं आणि खोलीत नेऊन केलं भलतंच काही...

रात्री मारहाण, सकाळी लग्न

माहिती मिळताच, मुलीचे पालक रात्री घरी पोहोचले आणि मुलाला पुन्हा मारहाण केली. या सगळ्या प्रकारानंतर गावप्रमुख आणि इतर लोकांनी मुलीच्या वडिलांची समजूत घालून प्रेमी युगुलांचे लग्न लावण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी सकाळी मुलाचे कुटुंबीय हे गावात पोहोचले आणि दोन्ही कुटुंबीय पंचायतीसमोर आले. ज्यामध्ये दोन्ही पक्षांच्या संमतीने प्रेमी युगुलांचे लग्न झाले.

दरम्यान, या सगळ्या घटनेची सध्या उत्तराखंडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकदा अशा प्रकरणात मुलीकडील किंवा मुलाकडील मंडळी ही अत्यंत टोकाचं पाऊल देखील उचलतात.

हे ही वाचा>> पतीला नव्हती आवडत सावळ्या रंगाची पत्नी, पत्नीसोबत केलं 'असं' काही की...

पण ठाकूरद्वारा गावातील काही ज्येष्ठ गावकऱ्यांनी तरुणीच्या कुटुंबीयांची आणि तरुणाच्या कुटुंबाची समजूत काढून झालं गेलं विसरून जायला लावलं. एवढंच नव्हे तर यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून त्यांनी तरुण मुला-मुलीचं लग्न लावून देण्यास सांगितलं. जेणेकरून आता ते एका बंधनात अडकून राहतील.

    follow whatsapp