संपलेल्या पक्षांना महत्त्व देत नाही, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई तक

• 09:44 AM • 10 Apr 2022

मशिदीच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरूद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करत ते तातडीने बंद केले पाहिजेत अशी मागणी केली. ते बंद झाले नाहीत तर आम्हाला हनुमान चालीसा पठण करावं लागेल तेही दुप्पट आवाजात असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. या […]

Mumbaitak
follow google news

मशिदीच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरूद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करत ते तातडीने बंद केले पाहिजेत अशी मागणी केली. ते बंद झाले नाहीत तर आम्हाला हनुमान चालीसा पठण करावं लागेल तेही दुप्पट आवाजात असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

हे वाचलं का?

या सगळ्यानंतर मनसेने आज रामनवमीचं औचित्य साधत दादर येथील शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण आणि धार्मिक गाणी लावली होती. त्यानंतर मनसेवर कारवाईही करण्यात आली. याबाबत आज आदित्य ठाकरेंना विचारलं असता संपलेल्या पक्षांना महत्त्व देत नाही असा खोचक टोला आदित्य ठाकरेंना त्यांच्याच काकांच्या पक्षाला म्हणजेच राज ठाकरेंच्या पक्षाला लगावला आहे.

रामनवमीचं औचित्य साधून मनसेने शिवसेना भवनासमोबर हनुमान चालीसा सुरू केली होती आणि धार्मिक गाणीही मोठ्या आवाजात लावली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचत कारवाई केली आणि भोंगे तसंच कार जप्त केली. याबाबत पर्यावण मंत्री आदित्य ठाकरेंना विचारलं असता संपलेल्या पक्षाला मी महत्त्व देत नाही आणि स्टंटबाजीला भाव देत नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

Raj Thackeray Speech: राज ठाकरे यांचं पाडवा मेळाव्यातील भाषण जसंच्या तसं

मशिदीवरील भोंग्यावरुन राज ठाकरे काय म्हणाले होते?

‘माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना… आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान?’

‘उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता आवरता नाकीनऊ येतील इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत.”

‘अनेक मदरसे असे आहेत की जिथे काय घडतंय, तेच समजत नाही. ही सगळी पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली ही लोकं आहेत. नगरसेवक, आमदार, खासदारांना याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते कशात लागले, आधार-रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच.’

‘एक दिवस असा येईल की त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतील. काय करून ठेवलं म्हणून. एकदा पोलिसांशी बोलून बघा. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. आमचं कुणाचं लक्ष नाही.’

‘मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची.’

    follow whatsapp