Rishi Sunak पंतप्रधान होताच भाजप नेत्याचा राजीनामा; पक्षावरही गंभीर आरोप

मुंबई तक

• 11:03 AM • 26 Oct 2022

हैदराबाद : भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची मंगळवारी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स यांनी सुनक यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केली. मात्र ब्रिटनमधील या राजकीय घडामोडींचे पडसाद आज भारतातही पाहायला मिळत आहेत. ऋषी सूनक पंतप्रधान होताच तेलंगणातील भाजपचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार आनंद भास्कर रापोलू यांनी पक्षाच्या […]

Mumbaitak
follow google news

हैदराबाद : भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची मंगळवारी ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स यांनी सुनक यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केली. मात्र ब्रिटनमधील या राजकीय घडामोडींचे पडसाद आज भारतातही पाहायला मिळत आहेत.

हे वाचलं का?

ऋषी सूनक पंतप्रधान होताच तेलंगणातील भाजपचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार आनंद भास्कर रापोलू यांनी पक्षाच्या प्राथमिक सदत्वाचा राजीनामा दिला. दोन पानी पत्र लिहित त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे पाठवून दिला. या पत्रात त्यांनी सुनक यांच्या नियुक्तीचा संदर्भ देऊन भाजपवर गंभीर आरोप केले.

रापोलू आपल्या राजीनामा पत्रात काय म्हणाले?

रापोलू यांनी आपल्या राजीनामा पत्रात भारतीय जनता पक्षाची ओळख फुटिरतावादी पक्ष अशी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, भाजप आपल्या वसुधैव कुटुंबकम या तत्वाशी एकनिष्ठ आहे का? ब्रिटननं केवळ ३ टक्के लोकसंख्या असलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला पंतप्रधान बनवलं. अमेरिकेमध्ये तर आधीच भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. हे देश एकप्रकारे दुर्लक्षित घटकालाही प्रोत्साहन देत आहेत.

भाजपचे दिवंगत आदर्श नेते दीन दयाळ उपाध्याय यांनी सर्वसमावेशक माणुसकी धर्माचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं. तसंच भाजपचे लाडके नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनीही राजधर्माची आठवण करुन दिली होती. पण भाजपनं आता त्यांच्या या सूचनांचं पालन केलं का? असा सवाल करत भाजपची ओळख एक भयानक आणि फुटिरतावादी पक्ष बनला आहे, असा आरोपही त्यांनी केला..

दरम्यान, येत्या दोन वर्षांत तेलंगणामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच रापोलू यांनी राजीनामा दिला. गेल्या 4 वर्षांत मला राष्ट्रीय भूमिकेपासून दूर ठेवण्यात आलं. मला अपमानित आणि कमी लेखण्यात आलं. मला पक्षातून बाहेर काढण्याचाही प्रयत्न झाला. असेही अनेक गंभीर आरोप त्यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात केले आहेत.

    follow whatsapp