Hatkanangale Lok Sabha : "जयंत पाटलांनी ठाकरेंना सांगितलं की...", शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट

भागवत हिरेकर

• 12:24 PM • 05 May 2024

Raju Shetti hatkanangale lok sabha : उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टींना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. तो शेट्टींनी नाकारला. पण, या मागे जयंत पाटील होते, असा दावा राजू शेट्टींनी केला आहे. त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला.

राजू शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याचा होता प्रस्ताव.

हातकणंगलेच्या जागेबद्दल जयंत पाटलांनी ठाकरेंना सल्ला दिला होता, असा दावा शेट्टींनी केला आहे.

follow google news

Hatkanangale Lok Sabha, Raju Shetti Uddahv Thackeray : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठिंबा देणार अशी चर्चा सुरूवातीला झाली. नंतर मशाल चिन्हावरून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव राजू शेट्टी यांना दिला गेला. पण, शेट्टींनी तो नाकारला. पडद्यामागे नेमकं काय झालं, याबद्दल आता राजू शेट्टी यांनीच मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Raju Shetty claimed that Uddhav Thackeray was advised by Jayant Patil that i should contest elections on Shiv Sena's torch symbol from Hatkanangale Lok Sabha)

हे वाचलं का?

राजू शेट्टी यांनी हातकणंगलेच्या जागेबद्दल ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेचा बीबीसी मराठी ला दिलेल्या मुलाखतीत घटनाक्रम सांगितला.

महाविकास आघाडीतून तुम्ही बाहेर पडलात, पण त्यांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा, ही भूमिका विरोधाभासी वाटत नाही का?, असा प्रश्न राजू शेट्टी यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. 

राजू शेट्टी हातकणंगलेच्या जागेबद्दल काय काय बोलले?

प्रश्नाला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले, "विरोधासच आहे ना. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. मी आघाडीत का येत नाही, तर मी स्पष्ट सांगितलं आहे की, आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. पण, त्यांना त्यांच्यातून फुटून जाणाऱ्या खासदारांचा पराभव करायचा होता. मग त्यांनी उमेदवार उभा करून नये, मतविभागणी टाळावी, असे व्यावहारिक समझोते होतच असतात. व्यावहारिक पातळीवर उमेदवार कमी केला असता तर काही बिघडत नव्हतं."

हेही वाचा >> महाराष्ट्रातील दहा खासदारांना तिकीटं न देण्याची 'ही' आहेत कारणं

"हा प्रस्ताव त्यांच्याकडूनच (उद्धव ठाकरे) आला होता म्हणून मी त्यांना भेटलो. त्यांच्याकडून प्रस्ताव आला नसता, तर मी त्यांना भेटलोही नसतो. कारण मी गेल्या पाच वर्षांपासून... त्यावेळी महाविकास आघाडी एकसंध राहील असे चित्र होते आणि त्यावेळी मविआची राज्यात सरकार होते. त्यावेळीपासून या मतदारसंघात आपल्याला स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे, असे गृहीत धरून तयारी करत होतो", असा खुलासा राजू शेट्टी यांनी केला. 

"आघाडीत न येता पाठिंबा देण्याचे केले होते मान्य"

आघाडीत येणार नाही, पाठिंबा देणार हे त्यांनी मान्य केले होते, असा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरे हा मतदारसंघ पूर्णपणे मला सोडायला तयार होते. म्हणून तर त्यांनी सांगलीची जागा मागून घेतली. सुरूवातीला उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की, पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा द्या, मग दोन जागा कशा आल्या?"

हेही वाचा >> लोक फोन करून सांगताहेत की, भाजपला नाही 'नोटा'ला मत देणार -सुमित्रा महाजन

"त्यांची (उद्धव ठाकरे) मानसिकता ही झाली होती की,  ही (हातकणंगले) तर सोडून द्यावी लागणार. इतर पक्षानांही असं वाटत होतं की, लढवण्यापेक्षा सोडून दिलेली बरी किमान भाजपचा पराभव करणारा उमेदवार इथे निवडून येऊ शकतो", असे ते म्हणाले. 

"स्वाभिमानी शेतकरी संघटना मी बरखास्त करायची होती का?"

"सांगलीची जागा त्यांना दिली गेली कारण कोल्हापूरची शिवसेनेची जागा होती, तिथे काँग्रेसने उमेदवार उभा केला. कारण शाहू महाराज शिवसेनेत जायला तयार नव्हते. मग असं असताना अचानक शिवसेनेकडून मला निरोप आला की, तुम्ही आमचं चिन्ह घ्यायला पाहिजे, मशाल. चिन्ह घेणं याचा अर्थ म्हणजे मला त्यांच्या पक्षात प्रवेश करावा लागला असता. मग त्यांच्या पक्षाची एकूण घटना लक्षात घेता, त्यांच्या पक्षाच्या जे कार्यक्रम आहेत, ते सोडून दुसऱ्या गोष्टी सदस्याला करता येत नाही. मग स्वाभिमानी शेतकरी संघटना मी काय बरखास्त करायची होती का?", असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा >> भाजप-एनडीए किती जागा जिंकेल? पवारांनी थेट आकडाच सांगितला

"शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं होतं का? ते पण, मला खासदार व्हायचं म्हणून... मी एका क्षणाचाही विचार न करता सांगितलं की, एकवेळ मी मान कापून देईन, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. एकटं सोडणार नाही", असे शेट्टी म्हणाले. 

उद्धव ठाकरेंना जयंत पाटलांनी सल्ला दिला

"जयंत पाटलांनी त्यांना (उद्धव ठाकरे) सांगितलं की, इथं (हातकणंगले लोकसभा) तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा. किंवा आता राजू शेट्टी कोंडीत सापडलेला आहे. त्या सगळ्यांचा अंदाज चुकला. त्यांना वाटलं की, मी कोंडीत सापडल्याने त्यांच्या अटी शर्थी मान्य करेन आणि चिन्ह स्वीकारायला तयार होईन", 

"त्यांना सल्ला दिला गेला की, तुम्ही प्रेशर आणलं तर हा माणूस (राजू शेट्टी) मशाल घ्यायला तयार होईल. त्यामुळे शिवसेनेची आणखी एक जागा वाढेल. मी त्याला नकार दिला", असा गौप्यस्फोट राजू शेट्टींनी केला.

    follow whatsapp