Lok Sabha election Maharashtra : महाराष्ट्रातील दहा खासदारांना तिकीटं न देण्याची 'ही' आहेत कारणं 

भागवत हिरेकर

Maharashtra Lok Sabha election latest News : यावेळी महाराष्ट्रातील दहा विद्यमान खासदारांना तिकीट देणं टाळलं आहे.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते.
महाराष्ट्रातील १० खासदारांची तिकिटं कापण्यात आली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक महाराष्ट्र

point

कोणत्या पक्षांनी कापली विद्यमान खासदारांची तिकीटं?

point

शिवसेनेच्या किती खासदारांचा समावेश?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचलाय. सर्वच मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. आता महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांचं दान पदरात पडावं म्हणून पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसताहेत. पण, यातच एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे तिकिटं कापलेल्या खासदारांचा! यावेळी महाराष्ट्रातील १० विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहेत... हे खासदार कोण आहेत, ते कोणत्या पक्षाचे आणि त्यांना उमेदवारी का नाकारलीये. (Why Did Sitting MPs from maharashtra ticket cut by their Parties)

२०१९ मध्ये लोकसभेत गेलेल्या महाराष्ट्रातील ४८ पैकी १० विद्यमान खासदारांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आलीये, तर दोन खासदारांनी निवडणुकीतून माघार घेतलीय. तिकीट नाकारण्यात आलेल्या खासदारांमध्ये सर्वच खासदार हे महायुतीतील पक्षाचे आहेत. या खासदारांचा पत्ता का कट झाला, हे समजून घेण्या आधी ते खासदार कोण आहेत? हे बघुयात...

यात पहिलं नाव आहे कृपाल तुमाने यांचं. त्यानंतर उत्तर पूर्व मुंबईचे मनोज कोटक, उत्तर मुंबईचे गोपाळ शेट्टी, जळगावचे उन्मेष पाटील, सोलापूरचे जयसिद्धेश्वर स्वामी, बीडच्या प्रीतम मुंडे, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील, उत्तर मध्य मुंबईमधील पूनम महाजन आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित... या दहा जणांना इच्छा असून, त्यांच्या पक्षाने संधी नाकारली. 

खासदारांची तिकिटं का कापलीये?

भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारी नाकारण्याचं पहिलं कारण म्हणजे अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आलेली वस्तुस्थिती... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पक्षांनी प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात सर्वेक्षण केले होते, ज्यात त्यांच्या विरोधी वातावरण असल्याचे आढळून आले. त्यामुळे भाजपने शिंदेंकडे काही विद्यमान खासदारांना उमदेवारी न देण्याचा आग्रह धरला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp