सत्तेच्या गैरवापराचं हे उदाहरण, अशी कारवाई होईल याची कल्पना होतीच – शरद पवार

मुंबई तक

• 05:19 AM • 23 Feb 2022

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी ईडीचं पथक नवाब मलिकांना चौकशीसाठी कार्यालयात घेऊन आलं आहे. दाऊदचा हस्तक सरदार खानकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी मलिक यांची चौकशी केली जात आहे. ईडीच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ईडीच्या या कारवाईवर […]

Mumbaitak
follow google news

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी ईडीचं पथक नवाब मलिकांना चौकशीसाठी कार्यालयात घेऊन आलं आहे. दाऊदचा हस्तक सरदार खानकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी मलिक यांची चौकशी केली जात आहे. ईडीच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

हे वाचलं का?

ईडीच्या या कारवाईवर काय बोलावं, यात बोलण्यासारखं काहीच नाही. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहता अशी काहीतरी कारवाई केली जाईल याचा आम्हाला अंदाज होताच असं शरद पवार म्हणाले.

हा महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न ! मलिकांच्या ईडी चौकशीवर राऊतांची प्रतिक्रीया

“सत्तेचा गैरवापर कसा गेला जातोय याचं हे उत्तम उदाहरण आहे. या कारवाईक काय प्रतिक्रीया देणार, यात नवीन काहीच नाही. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहता कधी ना कधी त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल याची आम्हाला कल्पना होतीच.” यावेळी शरद पवारांनी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.

काहीही झालं की दाऊदचं नाव घेतलं जात, त्यात पुरावे किती असतात हे माहिती नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हाही माझ्यावर असाच आरोप झाला होता. त्याला आता २५ वर्ष झाली. जी लोकं केंद्राविरुद्ध भूमिका मांडतात त्यांना अशा पद्धतीने केंद्रीय तपायसंत्रणेच्या माध्यमातून त्रास दिला जातो. दाऊदसारख्या लोकांची नाव घेऊन बदनाम केलं जातं, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ईडीच्या या कारवाईचा निषेध केला आहे. ईडीने स्वतःचे पोलीस आणून कोणतीही नोटीस न बजावता केलेली ही कारवाई म्हणजे सर्व गोष्टींची पायमल्ली करण्याचा प्रकार आहे. नवाब मलिकांनी मध्यंतरी काही प्रकरणं बाहेर काढली त्याला उत्तर म्हणून ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई म्हणजे मलिकांवर राग काढण्याचा प्रकार आहे. दाऊदवरील आरोपांवर मलिकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरपावर करुन विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही नवाब मलिक म्हणाले.

    follow whatsapp