दगड आमच्याही हातात असू शकतात हे कुणी विसरू नये, संजय राऊत यांचा सूचक इशारा

मुंबई तक

• 09:09 AM • 01 Nov 2021

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. ‘हमाममे सब नंगे है. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. दगड आमच्याही हातात असू शकतात’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी […]

Mumbaitak
follow google news

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. ‘हमाममे सब नंगे है. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. दगड आमच्याही हातात असू शकतात’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

हे वाचलं का?

जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. जर तुम्ही आमच्यावर दगडफेक कराल तर दगड आमच्याही हातात असू शकतो. महाराष्ट्रात अफू सांगाजा यांची शेती आहे का असा प्रश्न पडू लागला आहे इतके आरोप झाले आहेत. मात्र राजकारणात एक कायम म्हटलं जातं की हमाममें सब नंगे. ही गोष्ट भाजपने विसरू नये असंही संजय राऊत यांनी सुनावलं आहे.

नवाब मलिक यांच्या जावयावर खोटा खटला दाखल केला होता. त्यांची वेदना आम्ही समजू शकतो. आम्ही सगळे नवाब मलिक यांच्या पाठिशी आहोत. महाविकास आघाडीचे राजकीय नेते, त्यांची मुलं यांना त्रास दिला जातो आहे. राजकीय विरोधकांना अशा प्रकारे संपवण्याचं काम कधी झालं नव्हतं आता ते होतं आहे. शरद पवारांवरही चिखलफेक कऱण्यात आली. भाजपने त्यावर सविस्तर भूमिका मांडली पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले.

शरद पवार यांनी राजकारणात 50 वर्षांपेक्षा जास्त काळ काढला आहे. अशावेळी त्यांच्यावर जर घाणेरडे आरोप झाले तर महाराष्ट्र सहन करणार नाही. आमच्याही हातात उद्या दगड असू शकतात आणि तुमच्याही काचेवर दगड पडू शकतात. आम्ही अजून संयम बाळगला आहे. आम्हाला संयम सोडायला लावून नका नाही तर अत्यंत वाईट पातळीवर ही सगळी लढाई जाईल असाही इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

‘देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत. फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहतो. ज्याला भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे’, असा खळबळजनक आरोप मलिकांनी केला.

नीरज गुंडे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या जास्त संपर्कात, देवेंद्र फडणवीस यांचं मलिकांना प्रत्युत्तर

फडणवीसांनी काय उत्तर दिलं?

नीरज गुंडेला मी ओळखतो, माझे आणि त्याचे संबंध नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आहेत. मी नीरज गुंडे यांच्या घरी जायचो. मात्र उद्धव ठाकरेही माझ्यापेक्षा जास्तवेळा त्यांच्या घरी गेले आहेत. एवढंच नाही तर नीरज गुंडे माझ्यापेक्षा जास्तवेळा मातोश्रीवर गेले असतील असंही फडणवीस म्हणाले आहेत.

    follow whatsapp