India vs Pakistan world cup: वर्ल्ड कपमधील भारत-पाकचा सामना कुठे होणार?

मुंबई तक

30 Mar 2023 (अपडेटेड: 30 Mar 2023, 11:05 AM)

आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामने नेमके कुठे खेळविले जाणार याविषयी गोंधळ निर्माण झाला आहे. आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे

india pak match in the world cup

india pak match in the world cup

follow google news

India vs Pakistan World Cup: या वर्षी होणार्‍या आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील परिस्थितीबाबत बराच गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही प्रकरणांबाबत वेगवेगळे अहवाल येत आहेत. आशिया चषकाबाबत एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर भारतीय संघ आपले सामने न्यूट्रल ठिकाणी खेळणार आहे. (Where will the India-Pak match in the World Cup?)

हे वाचलं का?

तर काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की संपूर्ण आशिया कप स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर होणार आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबतही असेच काही अहवाल येत आहेत. नुकतंच एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यामध्ये पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते.

अधिक वाचा- भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर; जय शाहांची घोषणा

भारतातच होणार वर्ल्डकपचे सर्व सामने

तर पाकिस्तान संघ विश्वचषकातील आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी म्हणजेच बांगलादेशमध्ये खेळणार आहे. भारतीय संघाने आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यामुळे हे सर्व केले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. पण काही काळानंतर एक वेगळाच अहवाल समोर आला, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषक भारतातच होणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान संघही येथे आपले सामने खेळणार आहे. हा रिपोर्ट क्रिकबझचा आहे, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचे ठिकाण सांगण्यात आले आहे.

 

अधिक वाचा- EKnath Shinde : भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही सामना खेळलो आणि…

पाकिस्तान आपले सामने बांगलादेशात खेळणार का?

आयसीसी बोर्डाच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, पाकिस्तान संघ बांगलादेशमध्ये आपले सामने खेळेल, अशी कोणतीही चर्चा अधिकृतपणे झालेली नाही. जोपर्यंत व्हिसाचा प्रश्न आहे, बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की पाकिस्तानसह कोणत्याही देशाच्या खेळाडूंना व्हिसाच्या बाबतीत कोणतीही अडचण येणार नाही. आयसीसीच्या योजनेत पाकिस्तानसाठी बांगलादेशचे कोणतेही ठिकाण नाही.

भारत-पाकिस्तान स्पर्धा येथे होऊ शकते

क्रिकबझच्या वृत्तानुसार, BCCI ने विश्वचषकाअंतर्गत होणाऱ्या 48 सामन्यांसाठी 12 ठिकाणे निवडली आहेत. प्रत्येक ठिकाणी 4 सामने आयोजित केले जाऊ शकतात. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होऊ शकतो. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दिल्ली किंवा चेन्नईमध्ये घेण्याचे निश्चित झाले आहे. जरी अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. वेळापत्रकाची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे.

 

अधिक वाचा- पाकिस्तानचे असद रौफ याचं निधन; स्पॉट फिक्सिंग, भारताचा बॅन ते मॉडेलच्या आरोपांमुळे राहिले चर्चेत

रिपोर्टनुसार, विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या 12 ठिकाणांमध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, मुंबई, राजकोट, गुवाहाटी, इंदूर, कोलकाता, बेंगळुरू, धर्मशाला, हैदराबाद आणि लखनौ आहेत. अंतिम फेरी अहमदाबादमध्ये आणि उपांत्य फेरी मुंबईत होऊ शकते. दुसरा उपांत्य सामना कुठे होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    follow whatsapp