पहिला पाऊस पहिलीच आठवण... मुंबईकरांना पावसात करावी लागणार वणवण!

मुंबई तक

अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतं. मात्र, यावेळी अशा प्रकारे रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी उपसणारे पंप उपलब्ध नसल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

 मुंबईकरांना पावसात करावी लागणार वणवण!
मुंबईकरांना पावसात करावी लागणार वणवण!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पावसामुळे मुंबईतील रेल्वे रुळांवर साचलं पाणी

point

मुंबईत पाणी उपसणाऱ्या पंपांची वानवा

point

मान्सूनपूर्व नियोजनाकडे रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष

Mumbai News: दरवर्षी वाट पाहायला लावणारा पाऊस यावर्षी वेळेआधीच कोसळू लागला आहे. यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये बऱ्याच समस्या ओढवल्याच्या बातम्या देखील पाहायला मिळतात. मुंबईसह बऱ्याच शहरात पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यामुळे सर्वत्र वाहतुकीवर विशेषत: रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं समोर येत आहे. अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांची तारांबळच उडाली आहे. खरंतर, दरवर्षी पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतं. मात्र, यावेळी अशा प्रकारे रेल्वे रुळांवर साचलेलं पाणी उपसणारे पंप निदर्शनास येत नसल्याची हादवरुन टाकणारी बाब समोर आली आहे. 

पाणी उपसणारे पंप

पाणी उपसणारे पंप नजरेस न पडल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय. आता यावरुन रेल्वेनेच असे पाणी उपसण्याचे पंप बसवले नसल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.

हे ही वाचा: भुयारी मेट्रोचा पहिल्याच पावसात खेळखंडोबा! मुंबईकरांचा संताप, प्रशासनावर चिडले

मान्सूनपूर्व नियोजनाकडे दुर्लक्ष

खरंतर, पाऊसाचं आगमन होण्याआधीच रेल्वे प्रशासन यासंबंधी समस्या ओढवू नयेत यासाठी पूर्वनियोजन करते. यासंबंधी वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यात प्रशासनाकडून करण्यात येतात. पाऊस येण्यापूर्वी प्रशासन विविध कामे पार पाडून रेल्वे प्रवास सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते. मात्र, यावर्षी पाऊस वेळेआधीच कोसळला असल्यामुळे मुंबईतील जवळपास सर्व रेल्वे मार्गांवरील मान्सूनपूर्व तयारीच्या नियोजनाची वानवा असल्याचं समोर आलं आहे. 

हे ही वाचा: Honey Trap: तरुणीच्या जाळ्यात अडकला अन्.. ठाणे शहरातून पाकिस्तानला गोपनीय माहिती देणारा तो तरूण कोण?

रेल्वे प्रशासनाचं मत

आता यासंबंधी रेल्वे प्रशासनाकडे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, 1 जूनपासून मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील पंप कार्यान्वित होणार आहेत आणि असे रेल्वे स्थानकांवरील काम नियोजनानुसार सुरू आहे. 26 मे (सोमवारी) अचानक झालेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वे रुळांवर भरपूर प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. येत्या दिवसांमध्ये पावसामुळे रेल्वे प्रवाशांची वाताहत होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून संबंधित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी प्रवाशांनी मागणी केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp