10th Result Best of 5: दहावीचा निकाल.. 'बेस्ट ऑफ 5' म्हणजे नेमकं काय? गोंधळू नका सोप्प्या भाषेत समजून घ्या

मुंबई तक

Best of 5 rule in SSC: 'बेस्ट ऑफ 5' ही पद्धत महाराष्ट्र एसएससी बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार ठरली आहे. पण ही नेमकी पद्धत काय? हे आपण नेमकेपणाने समजून घेऊया.

ADVERTISEMENT

'बेस्ट ऑफ 5' म्हणजे नेमकं काय?
'बेस्ट ऑफ 5' म्हणजे नेमकं काय?
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)बोर्डाच्या दहावीचा आणि CBSE बोर्डाचा आज   (13 मे) दहावीचा निकाल जाहीर झाला.  महाराष्ट्र बोर्डाचा राज्याचा SSC चा निकाल हा 94.10 एवढा लागला तर CBSE चा निकाल यंदा एकूण 93.66% एवढा लागला आहे. दरम्यान, या निकालानंतर आता 'बेस्ट ऑफ 5' याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये 'बेस्ट ऑफ 5' या संकल्पनेबद्दल चर्चा सुरू आहे. ही पद्धत नेमकी काय आहे आणि त्याचा निकालावर कसा परिणाम होतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

'बेस्ट ऑफ 5' म्हणजे काय?

एसएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना एकूण सहा विषय असतात: पाच मुख्य विषय आणि एक अतिरिक्त (व्होकेशनल किंवा पर्यायी) विषय. 'बेस्ट ऑफ 5' पद्धतीनुसार, अंतिम निकालाची टक्केवारी काढताना फक्त सर्वोत्तम गुण मिळालेल्या पाच विषयांचा विचार केला जातो.

हे ही वाचा>> CBSE Board 10th Result: CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, पाहा महाराष्ट्रात किती विद्यार्थी झाले पास?

म्हणजेच, जर एखाद्या विद्यार्थ्याला सहा विषयांपैकी एखाद्या विषयात कमी गुण मिळाले, तर तो विषय वगळून उरलेल्या पाच विषयांच्या गुणांची सरासरी काढली जाते. यामुळे विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी वाढण्यास मदत होते आणि त्यांच्यावरील ताण कमी होतो.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या विद्यार्थ्याला खालीलप्रमाणे गुण मिळाले:

हे वाचलं का?

    follow whatsapp