Maharashtra Weather : पुणे, नाशिक,सातारा आणि कोल्हापूरमध्ये उष्णतेच्या झळा! 'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह कोसळणार हलका पाऊस
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषत: कोकण किनारपट्टीवर, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागात उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या जिल्ह्यात सूर्य आग ओकणार ?

या जिल्ह्यात पडणार हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस

आजच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषत: कोकण किनारपट्टीवर, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागात उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती होती. काल गुरुवारी 1 मे रोजी या भागात कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसच या भागात काही ठिकाणी पावसाच्या सरी किंवा गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
कसं असेल राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आजचं हवामान?
तर पुणे, नाशिक,सातारा आणि कोल्हापूर,सोलापूरसह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत नोंद झाली होती. अशातच आज शुक्रवारी 2 मे 2025 रोजी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये कसं हवामान असणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
हे ही वाचा >> CBSE Result 2025: उद्या दहावी-बारावीचा निकाल लागणार? बोर्डाकडून मोठी अपडेट आली समोर!
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीत कोरडं हवामान राहणार आहे.
तसच नांदेड, लातूर,धाराशिवमध्ये हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर अकोला, अमरावती आणि वाशिममध्ये हवामान विभागाकडून कोणत्याही प्रकारचा इशारा देण्यात आला नाहीय. भंडारा,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यांसह 40-50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.