महाराष्ट्र दिन विशेष: जय जय महाराष्ट्र माझा... हे गाणं कोणी लिहिलेलं, काय आहे नेमका इतिहास?

रोहित गोळे

महाराष्ट्र दिन म्हटलं की, ‘जय जय महाराष्ट्र माझा’हे गाणं असं जणू समीकरणच बनलं आहे. जाणून घ्या या गाण्याचा नेमका इतिहास काय आहे.

ADVERTISEMENT

 जय जय महाराष्ट्र माझा... हे गाणं कोणी लिहिलेलं?
जय जय महाराष्ट्र माझा... हे गाणं कोणी लिहिलेलं?
social share
google news

मुंबई: ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे मराठी माणसाच्या मनात अभिमान आणि चैतन्य निर्माण करणारे गीत महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला. पण हे गाणं नेमकं लिहिलं कोणी, त्याचा नेमका इतिहास काय हेच आपण आज म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया.

जय जय महाराष्ट्र म्हटलं की, शाहीर साबळे हे नाव आपसूकच आपल्या तोंडी येतं. आपल्या पहाडी आवाजात अवघ्या मराठी मनामध्ये स्फूरण पेटवणाराचा हा आवाज होता. पण त्याशिवाय या अजरामर गाण्याचे शब्द आणि त्या गाण्याला नेमकं संगीत कोणी दिलं होतं. हे तुम्हाला माहिती आहे का?

हे ही वाचा>> Maharashtra Day 2025: द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes

कवी राजा नीळकंठ बढे यांनी लिहिलेल्या या गीताला श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले असून, शाहीर कृष्णराव साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजात गायले आहे. या गीताने मराठी मनावर अधिराज्य गाजवले असून, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत सविस्तर माहिती घेऊया.

मराठी मनाला चेतवणारा गीतकार कोण?

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत प्रसिद्ध मराठी कवी राजा नीळकंठ बढे (1912-1977) यांनी लिहिले आहे. मुंबईतील आकाशवाणीवर काम करताना त्यांनी मराठी अस्मितेला चालना देण्यासाठी हे स्फूर्तिदायी गीत लिहिले होते. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या यशानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्या निमित्ताने आकाशवाणीवर प्रसारित करण्यासाठी या गीताची रचना झाली होती. राजा बढे यांनी या गीतात महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, आणि मराठी माणसाचा अभिमान शब्दबद्ध केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp