Ind vs Pak: महाराष्ट्रातही वाजणार युद्धाचा सायरन! मॉक ड्रिल नेमकं काय होणार? वाचा सविस्तर...
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. त्यानंतर आता दोन्ही देशात युद्ध होण्याचीही शक्यता आहे. त्याच दृष्टीनं देशात संरक्षणाच्या दृष्टीनं मॉक ड्रील घेतले जाणार आहेत. गृह मंत्रालयाने विविध राज्यांना हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही तसे सायरन वाजवले जाणार आहेत. तसंच, हल्ला झाल्यास नागरिकांना वाचवण्यासाठीचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्रातही वाजणार युद्धाचा सायरन

नागरिकांच्या संरक्षणासाठी राज्यात मॉक ड्रिल करण्याचे आदेश

गृह मंत्रालयाचे युद्धाचं मॉक ड्रिल करण्याचे निर्देश
ind vs Pak: पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. यादरम्यान, गृह मंत्रालयाने बऱ्याच राज्यांना 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिला आहे. अशा हल्ल्यादरम्यान नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अशा वेळी कोणती खबरदारी घ्यायची?, हे जाणून घेण्यासाठी ही मॉक ड्रिल आयोजित केली जाईल. मात्र, गृह मंत्रालयाने यामध्ये कोणत्या राज्यांचा समावेश केला आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाहीये.
गृह मंत्रालयाच्या सूचना
गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या मते, हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन कधी आणि कसा वाजेल? याबद्दल एक मॉक ड्रिल असेल. देशातील अनेक राज्यांमध्ये नागरी संरक्षण विभागाला मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यासाठी सरकारने मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा: "तुझे वडील संतोष देशमुख यांना किती...", CM फडणवीस यांचं वैभवीला भावनिक पत्र, काय शब्द दिला?
मॉक ड्रिल दरम्यान 'हे' उपाय
मॉक ड्रिल दरम्यान काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. हल्ल्याच्या वेळी म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वाचवण्यासाठी पुढील उपाय असतील.
- हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरनच्या संचालनाची सूचना.
- हल्ल्याच्या दरम्यान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना नागरी सुरक्षिततेच्या प्रत्येक स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल.
- गरज पडल्यास वीज बंद करता यावी यासाठी क्रॅश ब्लॅक आउट उपायांचे प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून शत्रूला लक्ष्य गाठता येऊ नये.
- महत्त्वाचे कारखाने, कार्यालये आणि ठिकाणे लपविण्यासाठी आगाऊ प्रशिक्षण दिले जाईल.
- परिस्थिती बिघडल्यास ठिकाण कसे सोडायचे याचा सराव करण्यात येईल, म्हणजेच निर्वासन योजना देखील समाविष्ट केली जाईल.