मावस भावाच्या प्रेमात पडली अन् तरुणीने पहिल्या प्रियकराची केली निर्घृण हत्या! खुनाची स्टोरी वाचून थरकापच उडेल

मुंबई तक

Shocking Love Story Viral News :  उत्तरप्रदेशच्या आगरा येथे धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणामुळे एका ऑटो चालकाची निर्घृणपणे हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे.

ADVERTISEMENT

Shocking Murder Case Viral News
Shocking Murder Case Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोन्ही आरोपींनी बिलालच्या हत्येचा कट रचला

point

अशी केली बिलालची निर्घृण हत्या

point

त्या प्रेमप्रकरणामुळे बिलालल जीव गमवावा लागला

Shocking Love Story Viral News :  उत्तरप्रदेशच्या आगरा येथे धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणामुळे एका ऑटो चालकाची निर्घृणपणे हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. बिलाल असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 21 जूनला जोनल पार्कमध्ये असलेल्या झाडीत त्याचा मृतदेह सापडला. बिलालची हत्या त्याची प्रेयसी, तिचा पहिला प्रियकर आणि एका मित्राने मिळून केली होती. 

पोलिसात तपासात समोर आलं आहे की, 20 जून रोजी बिलाल सकाळी ऑटो घेऊन बाहेर पडला होता. पण तो रात्री घरी पोहोचलाच नाही. पुढच्या दिवशी 21 जूनला याबाबत त्याचे आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. स्थानिक लोकांनी मृतदेह आढळ्याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा >> Haldi in Water Trend: हळद पाण्यात टाकण्याचा भलताच ट्रेंड, अचानक कसा सुरू झाला?

दोन्ही आरोपींनी बिलालच्या हत्येचा कट रचला

मिळालेल्या माहितीनुसार, ईशा नावाच्या तरुणीचे आठ वर्षांपूर्वी बिलाल नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. पण काही काळानंतर ईशाने तिचा इदारा बदलला. बिलालचं शिक्षण कमी असल्याने त्याच्यासोबत राहताना संघर्ष करावा लागेल, असं तिला वाटलं. याचदरम्यान ईशाचं तिचा पहिला प्रियकर फरमानसोबत पुन्हा प्रेमप्रकरण सुरु झालं. त्यानंतर दोघांनी बिलालची हत्या करण्याचा कट रचला.

अशी केली बिलालची हत्या

फरमानने त्याचा जुना मित्र आमिर खानलाही हत्येच्या कटात सामील केलं. ईशाने बिलालचा फोटो, मोबाईल नंबर आणि ऑटोची माहिती फरमानला दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी बिलालशी मैत्री केली. 20 मे रोजी ईशाने बिलालला फोन करून सांगितलं की, फरमान आणि आमिर सीएनजी पेट्रोल पंपावर जात आहेत.

हे ही वाचा >> भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंगाचा आरोप, चहाच्या टपरीवर नेमकं काय घडलं होतं?

तिघांनी बिलालला पार्टीच्या बहाण्याने ऑटोमध्ये बसवून जोनल पार्ककडे नेलं. त्यानंतर पार्कच्या समोर ऑटो थांबवून दारूची पार्टी केली. जेव्हा विशात नशेत बेशुद्ध झाला, तेव्हा ऑटोमध्येच त्याच्या डोक्यावर दगडाने वार केला. बेशुद्ध झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याच्या दोन्ही हातांची नस कापली. तसंच त्याचा गळा कापून निर्घृण हत्या केली. त्यानंतर आरोपी त्याठिकाणाहून फरार झाला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp