Manvi Raj Singh : रांची ते मुंबई आणि लव्ह जिहाद, मानवीसोबत तनवीरने काय केलं?
लव्ह जिहाद प्रकरण : मॉडेल मानवी राज सिंह हिने तनवीर खान याच्यावर आरोप केले आहेत. तनवीरने यश नाव सांगून फसवले आणि लग्नासाठी आणि धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला असा आरोप मानवीने केला आहे.
ADVERTISEMENT

Manvi Raj Singh Tanveer Khan Love Jihad News : देशात लव्ह जिहादचा मुद्दा तापलेला असताना मॉडेलने केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. हा आरोप झारखंडची राजधानी रांची येथील यश मॉडेलिंग कंपनीच्या मालकावर करण्यात आला आहे. हा आरोप मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीने केला आहे. मूळची बिहारची रहिवासी असलेली मानवी राज सिंह चांगली मॉडेल होण्याचं स्वप्न उरी घेऊन झारखंडमधील रांची येथे आली होती. पण, तिच्यासोबत वेगळंच घडल्याचा आरोप तिने केला आहे.
मानवी राज सिंहने रांचीमधील एका ग्रूमिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. या संस्थेच्या मालकाने मानवीला पाहिले तेव्हा त्याला ती खूप आवडली. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण संस्थेच्या मालकाच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. दोघांमधील नाते अधिक वाढावे याबद्दल त्याच्या मनात होते.
Video >> नवनीत राणांना कोर्टाने झापलं, कोर्टात हजर झाल्यावर काय घडलं?
मानवी राज सिंहने केलेल्या आरोपांप्रमाणे त्याला मानवीशी लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने मानवीला प्रपोज केले. तेव्हाच मानवीला कळले की, ती ज्याला मित्र मानत आहे ती व्यक्ती तिच्याशी खोटे बोलली आहे. वास्तविक, संस्थेच्या मालकाने तिला त्याचे नाव यश असे सांगितले होते. पण, त्याचं खरं नाव तनवीर अख्तर खान आहे. हा सर्व प्रकार मानवीला कळल्यावर तिनेही त्याच्याशी असलेली मैत्री तोडली.
ब्लॅकमेलिंग, धर्मांतर करण्यासाठी मॉडेल मानवी सिंहवर दबाव?
मानवी राजच्या दाव्याप्रमाणे, बोलणं केल्याची गोष्ट तनवीरला आवडली नाही. तो तिच्यावर लग्नासाठी आणि धर्म बदलण्यासाठी दबाव टाकू लागला. पण, मानवीने त्याचा तिरस्कार करायला लागली होती. त्यामुळेच तिने तनवीरचा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर प्रकरण आरोप-प्रत्यारोपापर्यंत पोहोचले. तनवीर मानवीला ब्लॅकमेल करू लागला. वास्तविक, त्याच्याकडे मानवीचे काही वैयक्तिक फोटो होते. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.









