राहुल गांधी म्हणाले, ‘आणीबाणी ही चूक होती, पण जे आज होतंय ते…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: काँग्रेसने आणीबाणी लागू करणे ही ‘चूक’ होती परंतु पक्षाने भारताच्या घटनात्मक चौकटीवर कब्जा करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं आहे. दरम्यान, अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यातील व्यक्तीने आणीबाणी ही चूक असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आता याचे नेमके पडसाद राजकीय वर्तुळाता कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी हे चुकीचंच होतं. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. पण सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर निशाणा साधला. आरएसएस आपली माणसं पेरुन स्वतंत्र संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

कॉर्नेल विद्यापीठाचे प्रा. कौशिक बासु यांच्याशी केलेल्या व्हर्च्युअल संवादादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अधिक वाचा: “भूक, बेरोजगारी, आत्महत्या हे तीन पर्याय मोदी सरकारने ठेवले आहेत”

पाहा नेमकं काय म्हणाले राहुल गांधी

ADVERTISEMENT

‘मला वाटते की (आणीबाणी) ही एक चूक होती. पूर्णपणे ती चूक होती. आणीबाणीत जे घडले आणि आता जे घडतंय त्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. जे चूक होते आणि आता जे घडत आहे. कॉंग्रेस पक्षाने कधीही भारताला पकडण्याचा प्रयत्न केला नाही घटनात्मक चौकट. आमची रचना आम्हाला परवानगी देत नाही. आम्हाला ते करायचे असल्याससुद्धा आम्ही करू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. आणीबाणीमध्ये काँग्रेसने कधीही भारतातील संस्थात्मक रचनेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला नाही आणि स्पष्टपणे सांगायचं झाल्यास काँग्रेसकडे तशी क्षमता देखील नव्हती आणि भारताची जी संविधानात्मक रचना आहे ती याला परवानगीच देत नाही. जरी आपल्याला तसं करायचं असलं तरीही करता येत नाही.’ असं राहुल गांधी म्हणाले.

ADVERTISEMENT

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, ‘आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही, न्यायपालिकेकडून कोणतीही आशा नाही, आरएसएस-भाजपकडे भरपूर आर्थिक ताकद आहे. लोकशाही संकल्पनेवर हा मुद्दाम हल्ला आहे. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपला मदत करत आहे. पुद्दुचेरीमध्ये उपराज्यपालांनी अनेक विधेयकं पास होऊ दिली नाहीत. कारण त्या आरएसएसशी निगडीत होत्या. काँग्रेसने कधीही स्वतंत्र संस्थांचा फायदा घेतला नाही. मात्र, सध्याचं सरकार भारताच्या लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहचविण्याचं काम करत आहे.’ असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT