हौसाबाई पाटील यांनी सांगितल्या होत्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी

मुंबई तक

क्रांती सिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांचं निधन झालं आहे.वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मात्र 2018 मध्ये त्यांनी आज तकशी चर्चा करताना स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी सांगितल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हौसा पाटील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

क्रांती सिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाबाई पाटील यांचं निधन झालं आहे.वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मात्र 2018 मध्ये त्यांनी आज तकशी चर्चा करताना स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी सांगितल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हौसा पाटील समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी झटत राहिल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हौसाताई पाटील काही काळ समाजकारण व राजकारणातही सहभाग घेतला. पुरोगामी चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून हौसाताई पाटील यांची ओळख होती. सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहत होत्या.

काय सांगितलं होतं हौसाताईंनी आज तकला?

आम्ही जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढा देण्यास सुरूवात केली तेव्हा सांगली हा जिल्हा नव्हता. तेव्हा सातारा हाच जिल्हा होता. आज ज्याला सांगली म्हटलं जातं त्याला त्या काळी दक्षिण सातारा म्हटलं जात होतं. आम्ही आमच्या काही सहकाऱ्यांसह मिळून इंग्रजांचे शस्त्र लुटली होती. त्यांचा आधार घेऊन आमचे जे सहकारी तुरुंगात गेले आहेत आम्ही त्यांना सोडवत असू.

हे वाचलं का?

    follow whatsapp