'फडणवीसजी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, फक्त दुकानं नाही... ', राज ठाकरेंचं खुलं आव्हान

मुंबई तक

Raj Thackeray: 'महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र 100 टक्के लागू करणार म्हणजे करणार..' असं मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई Tak बैठक या कार्यक्रमात केलं होतं. यानंतर आता राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून फडणवीसांना याचविषयी खुलं आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंचं खुलं आव्हान
राज ठाकरेंचं खुलं आव्हान
social share
google news

मिरारोड: 'त्रिभाषा सूत्र 100 टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करूच..', असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak बैठक या कार्यक्रमात केलं होतं. ज्याला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुलं आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांची आज (18 जुलै) मिरारोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. याच जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना खुलं आव्हान दिलंय. (fadnavisji if you want to hindi compulsion just try it mns chief raj thackeray gave an open challenge to chief minister devendra fadnavis)+

जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा.. दुकानं नाही, शाळाही बंद करेन.'

हे ही वाचा>> CM फडणवीस म्हणालेले, 'त्रिभाषा सूत्र लागू करूच..' उद्धव ठाकरेंनी पुन्हा दिलं आव्हान

'राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी...', पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले... 

'महाराष्ट्रात राहतात तर शांतपणे राहा, मराठी शिका.. आमचं काही भांडण नाहीए तुमच्याशी.. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार. एवढं लक्षात ठेवा.' 

'खरं तर काय विषय होता, पहिले ते पाचवी हिंदी अनिवार्य.. म्हणजे हिंदी भाषा शिकली पाहिजे. त्यानंतर हे सगळं सुरू झालं.' 

'काल आमचे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. त्यांनी काल सांगितलं म्हणे.. तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार..' 

'आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता. फडणवीसजी तुम्ही सांगताय ना.. तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार.. मी आता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा.. दुकानं नाही, शाळाही बंद करेन.' 

'महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. मराठीसाठी.. मराठी सक्तीची.. इतर ज्या शाळा आहेत त्यात तुम्ही मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजे. ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागला आहात. कोणाच्या दबावापोटी? कोण दबाव टाकत तुमच्यावर?'

हे ही वाचा>> Mumbai Tak Baithak 2025: 'त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात 100 टक्के लागू करूच..' CM फडणवीसांची माघार नाहीच, ठणकावून सांगितलं! ठाकरे बंधूंना थेट आव्हान?

'हिंदीने काय भलं केलं तुमचं, कोणती भाषा घेऊन बसलोय? अरे त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय? मला कारणच नाही कळलं.' असं म्हणत राज ठाकरेंनी हिंदी भाषा सक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे. 

'मुंबई Tak बैठक'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्रिभाषा सूत्राबाबत काय म्हणालेले?

'मुंबई Tak बैठक'मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले की, 'पहिल्यांदा हा जीआर जेव्हा निघाला त्यानंतर अनेकांशी चर्चा झाल्या. तोपर्यंत चर्चा काय होती की, हिंदी अनिवार्य का? आपण असं म्हटलं होतं की, तिसरी भाषा ही हिंदी असेल. तोपर्यंत सगळ्यांचं म्हणणं होतं की, हिंदी अनिवार्य का? यानंतर आम्ही सगळ्यांशी चर्चा केली मग आम्ही असा विचार केली की, हेही म्हणणं योग्य असू शकतं. त्यामुळे इतर पर्याय असले पाहिजे.'

हे ही वाचा>> 'हे सगळे आमदार माजले.. असं लोकं बोलतायेत', CM फडणवीस विधानसभेत एवढे का संतापले?

'म्हणून आपण जीआर बदलला आणि सांगितलं की, हिंदी अनिवार्य नाही.. हिंदी घ्यायची असेल तर हिंदी घ्या.. किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा घ्यायची असेल तर ती भारतीय भाषा शिकवायला आम्ही तयार आहोत. पण 20 विद्यार्थी हवे नाही तर आम्हाला ती भाषा ऑनलाइन शिकवावी लागेल.'

'समजा, 2 मुलांनी सांगितलं की, आम्हाला तेलुगू शिकवा.. तर शिक्षक कुठून आणायचे? पण यानंतर गोलपोस्ट बदलला..  गोलपोस्ट काय झाला की? तिसरीपासून का? सहावीपासून का नाही? तोपर्यंत गोलपोस्ट हा नव्हता. तोपर्यंत गोलपोस्ट हा होता की, हिंदीच का?'

'त्यानंतर आम्ही सगळा अभ्यास केला. त्यात दोन मत आम्हाला पाहायला मिळाले. त्यात एक मत असं होतं की, तिसरीपासून याकरिता की, एक विविक्षित वय असतं की, ज्या वयामध्ये वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो. एक कोवळं वय आहे.' 

'वेगवेगळ्या भाषा शिकल्यामुळे मुलांच्या आकलनशक्तीचा विकास होऊ शकतो. त्याचा बौद्धीक विकास होतो. अशाप्रकारच्या रिसर्चच्या आधारावरच केंद्र सरकारने देखील एनईपीमध्ये ही शिफारस केली आहे.'

'पण त्यासंदर्भात वेगवेगळी मतं आल्याने आम्ही हा विचार केला की, हा अहवाल तर काही आपल्या काळात आला नव्हता. पुन्हा एकदा सगळ्यांची मतं ऐकून घेतली पाहिजे. म्हणून त्यावर आम्ही एक कमिटी तयार केली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो.. आमच्याकरिता हा विषय प्रतिष्ठेचा नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की, तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच. पहिलीपासून की कधी ते कमिटी त्याबाबत ठरेवल.'

'त्रिभाषा सूत्र 100 टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करू.. आणि माझा सगळ्यात जास्त विरोध कुठल्या गोष्टीला असेल तर ते म्हणजे.. इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हे मी सहन करणार नाही.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp