महाराष्ट्र सरकार विरुद्ध परमबीर सिंग; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, आता नव्या लढाईला सुरुवात - Mumbai Tak - maharashtra govt files petition against bombay hc order for cbi investigation in parambir singh case - MumbaiTAK
बातम्या

महाराष्ट्र सरकार विरुद्ध परमबीर सिंग; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, आता नव्या लढाईला सुरुवात

नवी दिल्ली: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने दिलेल्या CBI चौकशीच्या आदेशाविरोधात आता महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अॅड. सचिन पाटील यांच्यावतीने ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे. परमबीर सिंग यांनी जी याचिका हायकोर्टात दाखल केली होती त्यावर हायकोर्टाने निर्णय […]

नवी दिल्ली: आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने दिलेल्या CBI चौकशीच्या आदेशाविरोधात आता महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अॅड. सचिन पाटील यांच्यावतीने ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे.

परमबीर सिंग यांनी जी याचिका हायकोर्टात दाखल केली होती त्यावर हायकोर्टाने निर्णय देत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात आता ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, कोर्टाच्या या निकालानंतर आता महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी हे महाराष्ट्र सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार आहेत. दरम्यान, अनिल देशमुख त्यांच्यातर्फे देखील एक वेगळी याचिका दाखल करण्यात येणार आहे.

Anil Deshmukh resign: हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात घेणार धाव

मुंबई हायकोर्टात नेमकं काय घडलं होतं?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपांची CBI कडून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंकडे १०० कोटींची मागणी केल्याचा दावा केला होता.

या पत्रानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. यानंतर परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांची याप्रकरणी चौकशी व्हावी यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

कोण आहेत जयश्री पाटील? ज्यांच्या याचिकेमुळे अनिल देशमुखांना द्यावा लागला राजीनामा

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परमबीर सिंग हे मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि तिथे त्यांच्या याचिकेवर सुनावणी देखील झाली. मात्र हायकोर्टाने याचा निकाल राखून ठेवला होता.

काल (५ मार्च) मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर सिंग यांच्या याचिकेवरचा निकाल जाहीर केला. यावेळी उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणी CBI चौकशीचे आदेश दिले. महत्वाची गोष्ट म्हणजे १५ दिवसांमध्ये सीबीआयला आपल्या चौकशीचा अहवाल न्यायालयाला सादर करायचा आहे.

कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी तीनच तासात आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते दिल्लीला रवाना झाले.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपने टीकेचे बाणही चालवले. आता या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर अनिल देशमुख हे सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 4 =

या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा