शेतकरी हिंसक झाल्यास मोदी सरकार जबाबदार-शरद पवार - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / शेतकरी हिंसक झाल्यास मोदी सरकार जबाबदार-शरद पवार
बातम्या

शेतकरी हिंसक झाल्यास मोदी सरकार जबाबदार-शरद पवार

आत्तापर्यंत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र यापुढे जर शेतकरी हिंसक झाले तर त्याची सगळी जबाबदारी भाजप सरकारची असेल अशा शब्दात मोदी सरकारवर शरद पवार यांनी टीका केली आहे. 70 दिवसांपासून जास्त काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शेतकरी आंदोलन, इंधन दरवाढ या मुद्द्यांवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

सर्वसामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसला आहे. या समस्या कशा वाढतील याकडे मोदी सरकार लक्ष देतं आहे. पेट्रोलियम पदार्थांवर जास्त उत्पन्न घेतलं जातं आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे जनता नाराज आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

“आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्येशी काहीही घेणंदेणं नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या सत्तर दिवसांपासून जास्त काळ आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आंदोलक शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाहीत ही अत्यंत खेदाची बाब आहे. आजही आंदोलन शांततेत सुरु आहे. मात्र या आंदोलनाला जर हिंसक वळण लागलं तर मात्र त्याची संपूर्ण जबाबदारी ही मोदी सरकारची असेल. आजच्या घडीला शेतकऱ्यांना जी वागणूक मिळते आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे नक्कीच धोकादायक चित्र आहे.” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

विदेशी सेलिब्रिटींच्या ट्विट्सबाबत काय म्हणाले पवार?

भारतातल्या शेतकरी आंदोलनावरुन विदेशातील सेलिब्रिटी अर्थात पॉपस्टार रिहाना, पर्यावरणाची अभ्यासक ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांनी ट्विट केलं आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, “आपल्या देशातल्या शेतकऱ्यांची समस्या आंतरराष्ट्रीय झाली आहे, याबाबत बाहेरच्या कुणी भाष्य करणाऱ्यांचं समर्थन नाही. असं असलं तरी हे खरं आहे की देशातलं सरकार शांत राहिलं. त्यामुळेच ही समस्या देशाबाहेर गेली जे योग्य नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + twelve =

आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन! Virat Kohli चा फिटनेस मंत्रा, खातो 90% उकडलेलं अन्न; कारण जाणून तुम्हीही खाल! रवी शास्त्रीसोबत अफेअरची चर्चा, 30 चित्रपट नाकारून ओटीटीवर एन्ट्री! कोण आहे ‘ती’ अभिनेत्री? Sara Ali Khan: महाकालेश्वराच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्यांना साराचं चोख उत्तर, म्हणाली.. Ahmednagar ते ‘अहिल्यानगर’… नव्या नामांतराची रंजक कहाणी बिअर ओतताना कधीच ग्लास तिरपा करू नका, कारण… Vijay Sethupathi : सोशल मीडियावरून जडला जीव; ‘खलनायका’ची रोमँटिक Love story 82 वर्षाच्या अभिनेत्याची 53 वर्ष लहान गर्लफ्रेंड? आता होतेय आई… अंबानींच्या घरी चिमुकलीचं आगमन, श्लेाकाने दिला बाळाला जन्म दारूपासून चार हात लांबच राहतात ‘हे’ बॉलिवूड स्टार, एक तर 80व्या वर्षीही फिट IPL 2023 मध्ये कष्टाचं चीज झालं, ‘या’ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस Nirmala Nawale : अभिनेत्री नाही, तर राष्ट्रवादीच्या… नवरदेवाच्या लुकमध्ये चक्क Elon Musk! पाहिलेत का ‘हे’ खास Photo कोण आहेत IPL च्या टीमचे मालक, किती आहे श्रीमंत?