उन्हाच्या झळांनी कोमेजला नागपूरचा ‘अंबिया बहार’; संत्र-मोसंबीला गळती, शेतकरी चिंतेत

मुंबई तक

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी नागपूर जिल्हा हा संत्र्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये नागपुरातील संत्री निर्यात केली जातात. डिसेंबरचा महिना सरला की साधारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात संत्री आणि मोसंबीची नवीन फळं धरायला सुरुवात होते. नागपुरात या मोसमाला अंबिया बहार असं म्हटलं जातं. परंतू यंदा वाढत्या उन्हामुळे संत्र उत्पादक शेतकऱ्यांच्या अंबिया बहार कोमेजून गेला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

नागपूर जिल्हा हा संत्र्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये नागपुरातील संत्री निर्यात केली जातात. डिसेंबरचा महिना सरला की साधारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात संत्री आणि मोसंबीची नवीन फळं धरायला सुरुवात होते. नागपुरात या मोसमाला अंबिया बहार असं म्हटलं जातं. परंतू यंदा वाढत्या उन्हामुळे संत्र उत्पादक शेतकऱ्यांच्या अंबिया बहार कोमेजून गेला आहे.

वाढत्या उन्हाचा यंदा संत्राच्या पिकाला चांगलाच फटका बसताना दिसत आहे. सध्याच्या घडीला संत्र आणि मोसंबीची 80 टक्के फळं ही वाढत्या उन्हामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी संत्रं व मोसंबी ही फळपिके घेतात.

यावर्षी रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यातच आंबिया बहार बहरला. परंतू यानंतर थंडीचे प्रमाण कमी झालं आणि वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं आहे. उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्र आणि मोसंबीची फळं गळत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यासमोरचं संकट वाढलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp