भाजप नेत्याचे हात-पाय बांधून चिखलाने घातली आंघोळ, महिलांनी असं केलं तरी का?

मुंबई तक

BJP Leader: उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. येथे महिलांनी एकत्र येऊन भाजप नेते गुड्डू खान यांना चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली.

ADVERTISEMENT

भाजप नेत्याचे हात-पाय बांधून चिखलाने घातली आंघोळ
भाजप नेत्याचे हात-पाय बांधून चिखलाने घातली आंघोळ
social share
google news

महाराजगंज (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु येथील काही जिल्ह्यांमध्ये   अद्यापही पाऊस पडलेला नाही. याच दरम्यान, उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये नौतनवा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते गुड्डू खान यांना दोरीने बांधून जमिनीवर फेकण्यात आले आणि चक्क चिखलाने आंघोळ घालण्यात आली.

आता तुम्ही असा विचार करत असाल की आपण पावसाबद्दल बोलत होतो आणि अचानक आपण महाराजगंजमधील भाजप नेत्याचा का उल्लेख करत आहोत. खरंतर, भाजप नेत्याला चिखलाने आंघोळ घालण्याच्या पद्धतीमागील कहाणी थोडी वेगळीच आहे.

हे ही वाचा>> ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?

भाजप नेत्याला का घातली चिखलाने आंघोळ?

खरं तर, पूर्वी असे मानले जात होते की, जर गावप्रमुख किंवा शहरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीला चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली, त्याला बांधून त्याच्यावर चिखलाचे पाणी ओतले तर इंद्रदेव आनंदी होतो आणि त्या भागात पाऊस पडतो.

महाराजगंजमध्ये सध्या खूपच कमी पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी ही सध्या बरेच चिंताक्रांता आहेत. अशा परिस्थितीत, नौतनवा नगरपालिकेच्या महिलांनी ही जुनी प्रथा वापरून पाहण्याचा निर्णय घेतला आणि सर्व महिला गाणी गात नौतनवा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते गुड्डू खान यांच्या घरी पोहोचल्या.

हे ही वाचा>> 'तो बलात्कार करत होता, त्याचा मित्र पाहत होता, मैत्रिणीची वहिनी मात्र...', मुलीने सांगितली हादरवून टाकणारी कहाणी

ज्यानंतर महिलांनी त्याचे हातपाय दोरीने बांधले आणि त्यांना जमिनीवर ढकललं. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर चिखल आणि पाणी ओतले. यावेळी, महिला पावसाची गाणी गात होत्या आणि इंद्रदेवाची आठवण करत होत्या. 

यावेळी लोकांचं म्हणणं आहे की, दरवर्षी गुड्डू खानला चिखलाने आंघोळ घातली जाते आणि नंतर पाऊस पडतो. लोकांना आशा आहे की यावेळीही पाऊस पडेल. भाजप नेते या प्रथेला जुनी परंपरा म्हणत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp