महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 147 मृत्यूंची नोंद - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 147 मृत्यूंची नोंद
बातम्या

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 147 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 899 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 81 हजार 167 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.5 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 9 हजार 558 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 147 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.2 टक्क इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 31 लाख 24 हजार 800 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 22 हजार 893 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 34 हजार 423 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 645 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 14 हजार 625 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 9 हजार 558 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या आता 61 लाख 22 हजार 93 इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 147 मृत्यूंपैकी 98 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 49 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 179 ने वाढली आहे. हे 179 मृत्यू, पुणे-61, पालघर-28, सांगली-19, लातूर-13, ठाणे-11, सातारा-9, नाशिक-7, अहमदनगर-5, औरंगाबाद-5, बुलढाणा-4, कोल्हापूर-3, सोलापूर-3, बीड-2, हिंगोली-2, रत्नागिरी-2, अकोला-1, अमरावती-1, जळगाव-1, नागपूर-1 आणि सिंधुदुर्ग-1 असे आहेत.

10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्णसंख्या असणारे जिल्हे

मुंबई – 12 हजार 255

ठाणे – 16 हजार 657

पुणे- 17 हजार 708

सांगली- 10 हजार 657

कोल्हापूर- 12 हजार 902

महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, पुणे, ठाणे आणि मुंबई या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे. कोरोना रूग्णांची संख्या एकीकडे आटोक्यात येत आहे असं वाटत असलं तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे आता राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + two =

आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन! Virat Kohli चा फिटनेस मंत्रा, खातो 90% उकडलेलं अन्न; कारण जाणून तुम्हीही खाल! रवी शास्त्रीसोबत अफेअरची चर्चा, 30 चित्रपट नाकारून ओटीटीवर एन्ट्री! कोण आहे ‘ती’ अभिनेत्री? Sara Ali Khan: महाकालेश्वराच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्यांना साराचं चोख उत्तर, म्हणाली.. Ahmednagar ते ‘अहिल्यानगर’… नव्या नामांतराची रंजक कहाणी बिअर ओतताना कधीच ग्लास तिरपा करू नका, कारण… Vijay Sethupathi : सोशल मीडियावरून जडला जीव; ‘खलनायका’ची रोमँटिक Love story 82 वर्षाच्या अभिनेत्याची 53 वर्ष लहान गर्लफ्रेंड? आता होतेय आई… अंबानींच्या घरी चिमुकलीचं आगमन, श्लेाकाने दिला बाळाला जन्म दारूपासून चार हात लांबच राहतात ‘हे’ बॉलिवूड स्टार, एक तर 80व्या वर्षीही फिट IPL 2023 मध्ये कष्टाचं चीज झालं, ‘या’ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस Nirmala Nawale : अभिनेत्री नाही, तर राष्ट्रवादीच्या… नवरदेवाच्या लुकमध्ये चक्क Elon Musk! पाहिलेत का ‘हे’ खास Photo कोण आहेत IPL च्या टीमचे मालक, किती आहे श्रीमंत?