आम्ही उचलू ती पावलं मग राजकीय असतील डोकी फुटतील – संजय राऊत - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / आम्ही उचलू ती पावलं मग राजकीय असतील डोकी फुटतील – संजय राऊत
बातम्या

आम्ही उचलू ती पावलं मग राजकीय असतील डोकी फुटतील – संजय राऊत

मुंबई तकः बेळगावात महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वाद पुन्हा चिघळलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बेळगावात तणावाचं वातावरण आहे. मराठी माणसांवर इथे जे हल्ले होताहेत ते थांबविण्यासाठी केंद्राने मध्यस्थी केली पाहिजे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच ते लाठ्या, काठ्या आणि बंदूका दाखवताहेत तर बंदूका आमच्याकडे पण आहेत. त्यांनी आम्हाला जर कठोर पावलं उचलायला भाग पाडलं तर आम्ही उचलू ती पावलं मग सरकारी नसतील तर राजकीय असतील. डोकी फुटतील मग केंद्रात बोंबलत जा असा इशाराही राऊत यांनी दिला.

बेळगावात सीमावादावरुन गेल्या काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचे होणारे हाल हा चिंतेचा विषय आहे. गेले आठ दिवस जे हल्ले आणि खुनी खेळ सुरू आहेत त्यावर कोणी काहीच का बोलत नाही असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यावर बोलण्याची आणि हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे.

या हल्ल्यांविषयी बोलताना राऊत म्हणाले की एक बीजेपी स्पॉन्सर्ड संघटना आहे. जे हल्ले करताहेत. अशा प्रकारे जे हल्ले होताहेत. सीमावासीयांना पाण्यात पाहण्याचं तंत्र अवलंबलं आहे. बेळगावला महाराष्ट्रात आणायचं की नाही ते नंतर पाहू. म्हणजे आणूच. पण आधी बेळगाव भागातील कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झालीय ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. यासाठी पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तिथे जाऊन बोलणं करण्याची आवश्यकता असल्याचं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

केंद्राने हस्तक्षेप करावा

बीजेपी स्पॉन्सर्ड एक संघटन आहे. जे हल्ले करताहेत. शिवसैनिकांना हल्ले करतात हा चिंतेचा विषय आहे. याबाबत खुप मोठी चिंता आहे. बेळगावात गेले आठ दिवस जो हल्ला सुरूय. खुनी खेळ सुरूय त्यावर कोणी काहीच बोलत नाहीत. प्रधानमंत्री देखील काहीच बोलत नाहीत. ते काठ्या घेऊन डोकी फोडताहेत तर आम्ही पण दांडे घेऊन जाऊ का? आम्ही पण त्याचप्रकारे उत्तर देऊ शकतो. हा देशांतर्गत प्रकरण आहे. भारत -पाकिस्तान वाद नाही. तेव्हा याबाबत आधी कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याची आवश्यकता आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − four =

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा ‘या’ तरुणीला पाहून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल ही तर… चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री ‘सिंगल’,कोण आहेत ‘या’ Actress? ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर? Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक