स्मृती इराणींनी 'ऐहसान फरामोश' असं ट्विट का केलं? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / स्मृती इराणींनी ‘ऐहसान फरामोश’ असं ट्विट का केलं?
बातम्या

स्मृती इराणींनी ‘ऐहसान फरामोश’ असं ट्विट का केलं?

मुंबई: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उत्तर भारतातील राजकारणाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर थेट हल्ला केला आहे. ‘एहसान फरामोश’ असं ट्विट करत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. तसंच यामुळे आता उत्तर विरुद्ध दक्षिण अशा राजकारणाला सुरुवात झाली आहे. यावेळी स्मृती इराणी यांनी असंही म्हटलं आहे की, ज्या उत्तर भारतावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यांना लक्षात असू दे की, सोनिया गांधी या उत्तरेतीलच खासदार आहेत.

‘एहसान फरामोश’ असं ट्विट केल्यानंतर स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर चौफर टीका केली. स्मृती इराणी यांनी असं म्हटलं आहे की, ‘जर त्यांना उत्तर भारताच्या लोकांबाबत हीन भावना आहे तर हे उत्तर भारतात राजकारण का करत आहेत? प्रियंका वाड्रा यांनी आतापर्यंत राहुल गांधींच्या वक्तव्याचं खंडन का केलं नाही? गांधी कुटुंबीय जेव्हा अमेठीला परतील तेव्हा त्यांना या गोष्टीचं उत्तर नक्की द्यावं लागेल.’

त्या पुढे असंही म्हणाल्या की, ‘राहुल गांधी अमेठीमध्ये परत येवोत अथवा न येवो पण ते उत्तर भारताच्या लोकांचा अपमान करु शकत नाहीत. राहुल गांधी यांच्या बुद्धीमत्तेवर काँग्रेस नेत्यांचा किती विश्वास आहे हे पुद्दुचेरीमध्ये सगळ्यांनी पाहिलं.’

ही बातमी नक्की वाचा: मोदी सरकारने देशाचं आणि घराचं बजेट बिघडवलं-राहुल गांधी

राहुल गांधी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

तिरुवनंतपुरम येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी असं म्हटलं होतं की, ‘पहिल्या 15 वर्षासाठी मी उत्तरेचा (उत्तर भारत) खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळला येणे खूपच स्फूर्तिदायक होते कारण मला असे आढळले की लोक विषयांवर आणि फक्त वरवरच्या गोष्टींमध्ये रस घेत नाहीत तर मुद्दांबाबत तपशीलाने जाणून घेतात.’

दरम्यान, आता राहुल गांधींच्या याच मुद्द्यावरुन भाजपच्या नेत्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी हे फूटीचं राजकारण करत असल्याची टीका देखील भाजप नेते करत आहेत. त्यामुळे आता पुढील काही दिवसात या संपूर्ण प्रकरणावरुन आणखी गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − 3 =

‘या’ अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर? Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्..