राज्यपाल-ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, कोश्यारींच्या पत्राने ठिणगी? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / राज्यपाल-ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, कोश्यारींच्या पत्राने ठिणगी?
बातम्या

राज्यपाल-ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, कोश्यारींच्या पत्राने ठिणगी?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातल्या वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारला पत्र लिहून सूचना केल्या आहेत. पण राज्यपालांच्या या पत्रामुळे त्यांच्याच आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक कधी घेणार? अशी विचारणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिकामं आहे. पटोले यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला कार्यभार दिला.

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनासाठी विधानसभेचा अध्यक्ष निवडा, अशा सूचना राज्यपालांनी केल्या आहेत. पण कायदेशीर प्रक्रियेनुसार, राज्य सरकारकडून विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालांना कळवली जाते आणि त्यानुसार राज्यपाल हे विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या सूचना करतात. पण सध्याच्या परिस्थितीत राज्यपालांनी राज्य सरकारकडून पत्र मिळण्याआधीच विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी स्वतःहूनच पुढाकार घेतल्याचं दिसतं आहे.

ही बातमी देखील पाहा: ‘राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जातंय’

पुन्हा एकदा बहुमत चाचणी?

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद कोणाचं यावरून ठाकरे सरकारमध्ये कुरबुरी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता विधानसभा अध्यक्षपद सगळ्यांसाठी खुलं झालं आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. दुसरीकडे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया म्हणजे सरकारसाठी एक प्रकारची बहुमत चाचणीच असते. पण ठाकरे सरकार आज जाणार, उद्या जाणार अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची ठरते. नाना पटोलेंच्या राजीनाम्यावरून सरकारमधून नाराजीचा सूर उमटला होता. त्यामुळेच राज्यपाल कोश्यारींनी विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीचा हा सक्रीयपणा बुचकळ्यात टाकणारा आहे.

ही बातमी पाहिलीत का?: “मंत्रिमंडळाचा मान राज्यपालांनी राखावा, टाळी एका हाताने वाजत नाही”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one + 15 =

Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!