राज्यपाल-ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, कोश्यारींच्या पत्राने ठिणगी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातल्या वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारला पत्र लिहून सूचना केल्या आहेत. पण राज्यपालांच्या या पत्रामुळे त्यांच्याच आणि सरकारमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला पत्र पाठवून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक कधी घेणार? अशी विचारणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानं नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिकामं आहे. पटोले यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला कार्यभार दिला.

विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनासाठी विधानसभेचा अध्यक्ष निवडा, अशा सूचना राज्यपालांनी केल्या आहेत. पण कायदेशीर प्रक्रियेनुसार, राज्य सरकारकडून विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालांना कळवली जाते आणि त्यानुसार राज्यपाल हे विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहून निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या सूचना करतात. पण सध्याच्या परिस्थितीत राज्यपालांनी राज्य सरकारकडून पत्र मिळण्याआधीच विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी स्वतःहूनच पुढाकार घेतल्याचं दिसतं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ही बातमी देखील पाहा: ‘राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडलं जातंय’

पुन्हा एकदा बहुमत चाचणी?

ADVERTISEMENT

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद कोणाचं यावरून ठाकरे सरकारमध्ये कुरबुरी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता विधानसभा अध्यक्षपद सगळ्यांसाठी खुलं झालं आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. दुसरीकडे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया म्हणजे सरकारसाठी एक प्रकारची बहुमत चाचणीच असते. पण ठाकरे सरकार आज जाणार, उद्या जाणार अशा चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची ठरते. नाना पटोलेंच्या राजीनाम्यावरून सरकारमधून नाराजीचा सूर उमटला होता. त्यामुळेच राज्यपाल कोश्यारींनी विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीचा हा सक्रीयपणा बुचकळ्यात टाकणारा आहे.

ADVERTISEMENT

ही बातमी पाहिलीत का?: “मंत्रिमंडळाचा मान राज्यपालांनी राखावा, टाळी एका हाताने वाजत नाही”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT